'सबकुछ पुलं'ला आमंत्रणच नाही
Tuesday, February 9, 2010
'सबकुछ पुलं'ला आमंत्रणच नाही
पु. लं. चा शेवटचा चित्रपट म्हणजे ' गुळाचा गणपती '! त्यात सर्व काही पुलंचे होते. कथा , पटकथा , संवाद , गीते , संगीत आणि दिग्दर्शन , एवढेच नव्हे तर नायकाची भूमिकासुद्धा! हा चित्रपट सर्वत्र चांगला गाजला. पण पुलंची कमाई काय ? पुण्यात ' गुळाचा गणपती ' प्रकाशित झाला तेव्हा तो चित्रपट पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रण सुद्धा नव्हते. पुलं , सुनीताबाई आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी तिकिटे काढून चित्रपटाचा पहिला खेळ पाहिला!
(पुलं एक साठवणच्या जयवंत दळवीलिखित प्रस्तावनेतून)
पुलंकित
१९६५ साली पु.लं. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या
भरात श्री. श्रीराम मांडे यांनी ' पुलायन ' ही दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी ' पुलंकित ' शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रिय झाला.
0 comments:
Post a Comment