प्रेम
Friday, November 13, 2009
दाटून आलेल्या संध्याकाळी,
अगदी अवचित ऊन पडतं!
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्याही आयुष्यात प्रेम येत!!
शोधून कधी सापडत नाही,
मागून कधी मिळत नाही!
वादळ वेड घुसतं तेव्हा
टाळू आपण शकत नाही!!
प्रेमातल्या सफल विफलतेला,
खरं तर काहीच महत्व नसतं!
इथल्या पराजयात देखील,
जिंकल्याच सार्थक असतं!!
मात्र ते भोगण्यासाठी,
एक उसळणार मन लागतं!
संध्याकाळी सोनेरी उन्हासारख,
आयुष्यात प्रेम यावं लागत!!
0 comments:
Post a Comment