मराठी चारोळ्या

Pages

चारोळ्या2

Saturday, December 26, 2009

प्रेम करायचाच म्हटल तर
कुनाशिही जमत नाही
मनासारख्या जोड़ी दाराशिवाय
संसारात मन रमत नाही

कदाचित म्हणताना माणूस
नशिबावर अवलंबून असतो
हजारदा त्याच्याकडून फसुन
हित्याच्यावरच विश्वास ठेवतो

ओळखिच्या माणसाने
ओळखल्या सारखं वागायचं
कारण शोधून बोलन्यापेक्षा
कारनाशिवाय बोलायचं....

दिवेलागण वणव्यासारखी पसरते
रात्र झाल्यावर
पण आपलं घर मात्र उजळतं
तू दाराशी आल्यावर

रात्रं पटकन सरते
तुला उराशी धरून
मग दिवसभर तुला पहात राहते
मी परक्यासारखं दुरून

आभाळ बरसताना
सरळ दार लावून घ्यावं
नाहीतर स्वत:ला
दिशाहीन जाऊ द्यावं

पाऊस म्हणजे खरं सांगतो
परीक्षा असते स्वत:ची
किती गोष्टींची कबुली
आपण देत राहतो स्वत:शी

कुठून तरी येउन
पाऊस ईथला होउन जातो
आणि माझ्यासोबत मी बनुन
तो हलवा होउन पहातो

वेड्या क्षणी भास् होतो
तू जवळ असल्याचा
डोळे उगीच दावा करतात
तू स्पष्ट दिसल्याचा

पाऊस एकदाचा पडून जातो
पावसाचे दिवस असले की
आसवांचं तसं नसतं, ते पुन्हा येतात
एकदा डोळे पुसले की

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP