माझे इतर ब्लोग
-
गर्द अशा आठवणींने..7 years ago
-
-
मराठी चारोळ्या
Pages
महागाई
Wednesday, December 30, 2009
महागाईचे सगळे बहाणे
सहन करणे भाग असायचे
महागला तो gas भयंकर
जणू चुलीने डोळे मिटले
कशी मिळेल भाजी भाकर
भुकेने आतडे तुटले
तेल रॉकेल नसता घरी
लाकडे शेण्या की करी
महागाई पक्की सठेबाज
ती तर डबल भाव खायची
डबल भाव वाढतच
टंचाई नाव द्यायची
कशी करावी साजरी सणवारी
मनी खंत वाटुनी डोळ्यात येई पाणी
पेट्रोल भडकले डिसेल भडकले
गाडी कुठली त्वो व्हीलर हि fashion झाली
महागयीचा खर्या रेखा
मला कळून चुकल्या होत्या
मुले म्हणती फिरायला जायू
मजबूर मी कसे कुठे मी नेऊ
कशी मिळेल शांती जीवाला
कौन आवारे ह्या महागायीला
- सौ संजीवनी संजय भाटकर

हल्ली अस का होत
Tuesday, December 29, 2009
हल्ली अस का होत ते काही कळत नाही,
प्रशनच पडतात भरपूर पण उत्तर कही मीळत नाही.
कोणीतरी सोबत आहे अस क्षणभर वाटत,
त्या गोड सोबतीसाठी वेड मनही धावत सुटत.
तरीही मग ते दीशाहीन का होत ते काही कळत नाही,
वेड्या मनाचा सुर माझ्या कधीच कुणाशी जुळत नाही.
हल्ली अस का होत ते काही कळत नाही,
दीवस सरतो चुटकीसरशी पण रात्र काही टळत नाही.
एक्ट जगण्यात ही अर्थ आहे अस काहीस वाटत,
पण तेवढ्यात त्याच्या सहवासतल प्रेम मनात साठत,
तरीही मग मी एकटीच का ते काही कळत नाही,
सगळ्याना मीळत हव ते मग मलाच का ते मीळत नाही.
हल्ली अस का होत ते काही कळत नाही,
प्रशनच पडतात भरपूर पण उत्तर काही मीळत नाही.
माझ मन जरा जास्तच हळव आहे अस कधी वाटत,
रागाने येणार्या शब्दानी माझ्या अवघ आभाळही सहज फाटत.
मग माझेच शब्द एवढे कठोर का ते काही कळत नाही,
म्हणूनच वेड्या मनाचा सुर माझ्या कधी कुणाशी जुळत नाही.
हल्ली अस का होत ते काही कळत नाही,
दीवस सरतो चुटकी सरशी पण रात्र काही टळत नाही
त्याच्यावर प्रेम कराव आणी करतच रहाव वाटत,
क्षण दोन क्षणात मनी उदंड प्रेम दाटत.
पण मग तो माझा का नाही ते काही कळत नाही
सगळ्याना मीळत हव ते मग मलाच का ते मीळत नाही
हल्ली अस का होत ते काही कळत नाही,
प्रशनच पडतात भरपूर पण उत्तर काही मीळत नाही.
खरा रंग कळेना
की त्याला स्वत:चा खरा रंग कळेना
त्याने खूप विचार केला तरी
तो कसा होता ते
त्याला काही केल्या आठवेना
तो म्हणाला,
"मी आकाशाला निळा वाटतो
मी गवताला हिरवा वाटतो
मी सर्वांना त्यांच्यासारखाच वाटतो
मी खरा कसा ते, कोणाला कळतं
वेगळा आहे ते कोणाला कळतं"
मग त्याने एकच रंग ठेवायचं ठरवलं
एकाच रंगाला त्याचा खरा रंग मानलं
गवतावरच नाही तर
मातीवर पण तो रहायला लागला हिरवा
त्याला काही खोडकर मुलांनी
मातीवर ओळखलं परवा
त्याला या खऱ्या रंगाने
त्याचा वेगळेपणा दाखवला
आणि या खऱ्या रंगामुळे
त्या मुलांनी त्याला दगड मारून संपवला
सरडा मेला तरी
लोकांना जिवनाचा नियम कळावा
चार-चौघात गेल्यावर आपण
त्यांच्याप्रमाणे रंग बदलावा
कितीही वाईट वाटलं तरी
आपला खरा रंग लपवावा
कारण हे जग वेगळेपणाला घातक मानतं
आणि मग स्वत:च घातक बनून
आपल्याला आपला रंग बदलायला लावतं Read more...
आवडली आहे मला एक मुलगी
Saturday, December 26, 2009
आज आल्या चार ओळी मनात ,
केल्या कोण तरी वर ,
आवडली आहे मला एक मुलगी ,
ती हि इंटरनेट वर
आहे ती फार दूर ,
शेकडो मैला (miles) अंतरी ,
pan राहते ती इथेच ,
अगदी माझ्या हृदया सरी
माझ्याशी बोलायला तिला ,
मला थोडा मानवाव लागतं,
ती बोलते फार कमी ,
म्हणून जरा हसवावं लागतं
ओळख आमची नाही पूर्ण ,
आणि मैत्री फार नवी ,
मनात आहे एक ज्योती ,
मला हि मैत्रीण हवी
Read more...
चारोळ्या मनातल्या
तिने मला विव्हळताना पाहीलं
काय सांगु दोस्तहॊ
तिच्या गालावरुन रक्त ओघळत राहीलं
पण तुझा सहवास नव्हता
तूला भिती होती समाजाची
आणी मला एकटेपणा खात होता
नको विचारुस मज सखे
तुझा अबोला होता दिसभर
काल मी जगलोच कुठे
आणि तिचा गाल लाल झाला
नाकावरील राग पाहुन
बंदा हा बेहाल झाला
किनारी माझ्यासवे येनारं
हाथ हातात घेउन
वाळुत रेघोट्या ओढनारं
त्याला जाग करावं लागतं
चार ओळी जमवण्यासाठी
डोळ्यात कल्पनेला भरवावं लागतं
मी असा का वागतो
मित्र विचारती हा कोणाचा परिणाम
मी तिचे नाव सांगतो..
खुप नटखट वाटतेस
चश्म्यामागील डोळ्यातुन
जेव्हा तु लटका राग दाखवतेस…
अखेरचा श्वास घेत असलेले
कपड्यांवर डाग पडेल म्हणून
माणसाचे हाथ रोखलेले
सये असाच आतूर होतो
चांदण्यारातीतला चंद्र
मग चांदण्यांशी फितुर होतो
आणि चांदणी रात असावी
मी घ्यावे तुला मिठीत
आणि चांदण्यांची बरसात व्हावी
शब्दांबरोबर खेळन्याच
खेळता खेळता स्वत:ला
त्या दोन ओळींमध्ये लपवायच
सांगावे तूज सर्व काही
शब्द ओठी जमू लागलेच होते
पण त्या शब्दास आता अर्थ नाही
कसे फुटावे शब्दांना धुमारे
वाटते की सावलीच हरवली
मग शब्दतरी कशी साथ देतिल बिचारे
—————————————————–
अजूनी मला ते स्मरते आहे
तु लाजलेली तशीच समोर
काळ्या मेघांनी हे आभाळ पुन्हा भरतं आहे
तुझ्या वागण्यात बालिशपणा वाटतो
त्या खट्याळ नजरेनेच
गुदगुल्या झाल्याचा भास होतो
एरवी तु खुप गोड दिसतेस
पण दातात करंगळी दाबुन हसल्यावर
कैरीची आंबट फोड वाटतेस
आणि अंगावरी लाल साज
शिशिराच्या या सकाळी
वाटे उन्ह पडले आज
तुला मिठीत घ्यावे वाटते
तुझ्या त्या स्पर्शाने सखे
अंग अंग शहारावेसे वाटते
—————————————————–
एका नजरे मधेच जेव्हा
तुला ज्याच्यावर विश्वास बसतो
तोच तुझा खरा जोडीदार
आणि तोच तुझा खरा सखा असतो
आपलाच पाय घसरतो
पण लक्षात ठेव
तोल न सांभळनारे आपणच असतो
भुतकाळात हरवुन जातो
तुझ्याबरोबर घालवलेल्या क्षणांना आठ्वुन
अश्रुंना वाट मोकळी करुन देतो.
जिव घायाळ करुन जातो
का अशी लाजुन हसतेस सखे
माज्या ह्रुदयाचा एक ठोका चुकुन जातो..
आणि पसरलेला तो सुगंध,
पहाटेच्य त्या गुलाबी प्रहरा
मन होऊन गेले धुंद
जिव कासावीस होऊन जातो
ओळखीचा कुणी समोरुन
जेव्हा ओळख न दाखवता निघुन जातो
मला त्या मान्य आहेत
पण तुलाही मी उमगलो नाही
यातही का चुक माझीच आहे?
चारोळ्या तुमच्या साठी
दीप तेवे वृंदावनी,
सांज दाटली,दाटली,
आता येई परतुनी,
किती पाहू रे वाटुली?...
मेंदीभरल्या पाऊलीं,
पाणंदीला चढे लाली,
भाव-भावनांची नक्षी,
तीत खुबीने गुंफली...
जीवनाच्या आडावरी,
घागरींचे येणे-जाणे,
हिंदळती कटीवरी,
सुखदु:खाचे उखाणे...
सुर्यदेवाच्या साथीने,
प्रकाशाचे येणे-जाणे,
सुखदु:खाचा हा खेळ,
उन-सावलीच्या रुपाने...
पुलाखालून धो-धो पाणी वाहून गेलं,
तरीही नदी वाहतेच आहे,दुथडी भरून,
डोळ्यांमधून अलोट अश्रू वाहून गेले,
तरीही हसू फुटतंय अजून,आतून,कुठून?
मराठी चारोळ्या...!
माझ्यावरील विश्वास
माझ्या जगण्याचा श्वास आहे
भरभरून मिळून सारं काही
तुझ्या एका हाकेची आस आहे
तुझ्या त्या आश्वासक शब्दांमुळे
मी स्वत:ला खूप सावरलं होतं
मन तसं भिजून आलं होतं पण
अश्रूना मात्र मी आवरलं होतं
डोळे पाण्याने भरून आलेले आणि
मनात आठवणींचे आभाळ दाटलेले
झाकोळून गेल्या चेहृयावर माझ्या
थर टोकणार्या वेदनांचे साचलेले
किती ऋतू असे उन्हाळ्यात गेले
किती ऋतू तसे पावसात चिंब झाले
कळले नाही मला कधीही ते सारं
माझ्या मनात आसवांचे मेघ दाटलेले
मराठी चारोळ्या
घरात काळोख शिरेल म्हणुन
मी सगळी दारं लावून बसलो
आणि स्वत:च्या खुळेपनावर
अंधारात बसून हसलो
सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षला
दिवसाची खुप आश्वासन
देऊन रात्री मात्र फितूर झाला
चंद्राबरोबर चांदनी एकच असते
पण तीचं नक्की सांगता येत नाही
त्याला रोज बदलताही येइल पण
तीला ते जमणार नाही
गावातले सगळे रस्ते
रात्री गावाबाहेर पडतात
मला घरीच परतायचं असतं
पण ते मला रानात नेउन सोडतात
रात्रीची जागी राहून
मी त्या चांदनिला बघत होती
ती सुद्धा माझ्याप्रमाणे
एकटीच हसत होती........
नाही म्हणाले नसले तरी
हो सुद्धा बोलले नाहीतो
विचारून थांबला तरी
मला काही सुचले नाही .....
तू सोडून जाशील म्हणुन
मी वेडी झाली होती
आणि मी वेडी झाली म्हणुन
तू सोडून गेलास .......
काय सांगू तुला
जग माझ्यावर हसतं
तुझ्यासाठी वेडी झाली
असं उगाच बोलतं.......
मन किती वेडं असतं
नको तिथे धावतं
आपल्याला काय हवं आहे
हे त्याला बरोबर कळतं
तुझ्या शिवाय जगण्याचा
विचार आता करते ....
जीवन इथेच थांबलं बघ माझं
आता मरन्याचा विचार करते .....
पुन्हा मराठी चारोळ्या
सगळ्यान मध्ये तू असलास तरी
माझ्यासाठी तू ख़ास आहेस .....
माझे कड़क नियम दुसर्यांसाठी
तुला सगळ माफ आहे ......
शहाणं बनण्यापेक्षा मला
वेडं व्हायला आवडेल
तुझ्या सारख्या (दिड ) शहाण्यावर
विश्वास ठेवायला आवडेल .....
जगणं असह्य झाल्यावर
मरणही उशिरा येते
दुःख अजुन बाकी आहे
हे तेव्हा कळून येते
डोळ्यातून अश्रु ओघळला
की तोही आपला राहत नाही
वाईट याचंच वाटतं की
दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही।
तुझ्या विषयी बोलताना
मी ज़रा विचार करते
माझ्याशिवाय कोणी नसेल
याची मी खात्री करते ......
तू मला फसवणार होतास कधीतरी
हे आधीच मला माहीत होत
पण बर झाल मला अद्दल घडली
हे मनच माझ मानत नव्हत ........
घरात काळोख शिरेल म्हणुन
मी सगळी दारं लावून बसलो
आणि स्वत:च्या खुळेपनावर
अंधारात बसून हसलो.....
तुझ्या आठवणी आठवण्याचा
रोग लागलाय मला
तुझ्याकडचं विसरण्याच
औषध दे मला
तुझ्या पासून दूर जाताना
मन जड़ झाले होते
चेहरा हसरा दाखवला तरी
डोळे भरून आले होते ...
मला हव्या असणा-या व्यक्तिंपैकी
तू एक आहेस .....
पण तुझी इच्छा मी का करू ???
तू तर माझाच आहेस....
चारोळ्या2
प्रेम करायचाच म्हटल तर
कुनाशिही जमत नाही
मनासारख्या जोड़ी दाराशिवाय
संसारात मन रमत नाही
कदाचित म्हणताना माणूस
नशिबावर अवलंबून असतो
हजारदा त्याच्याकडून फसुन
हित्याच्यावरच विश्वास ठेवतो
ओळखिच्या माणसाने
ओळखल्या सारखं वागायचं
कारण शोधून बोलन्यापेक्षा
कारनाशिवाय बोलायचं....
दिवेलागण वणव्यासारखी पसरते
रात्र झाल्यावर
पण आपलं घर मात्र उजळतं
तू दाराशी आल्यावर
रात्रं पटकन सरते
तुला उराशी धरून
मग दिवसभर तुला पहात राहते
मी परक्यासारखं दुरून
आभाळ बरसताना
सरळ दार लावून घ्यावं
नाहीतर स्वत:ला
दिशाहीन जाऊ द्यावं
पाऊस म्हणजे खरं सांगतो
परीक्षा असते स्वत:ची
किती गोष्टींची कबुली
आपण देत राहतो स्वत:शी
कुठून तरी येउन
पाऊस ईथला होउन जातो
आणि माझ्यासोबत मी बनुन
तो हलवा होउन पहातो
वेड्या क्षणी भास् होतो
तू जवळ असल्याचा
डोळे उगीच दावा करतात
तू स्पष्ट दिसल्याचा
पाऊस एकदाचा पडून जातो
पावसाचे दिवस असले की
आसवांचं तसं नसतं, ते पुन्हा येतात
एकदा डोळे पुसले की
चारोळ्या1
पावसावरच्या निबंधाला
कधीच पूर्ण मार्क मिळत नाहीत
कारण मार्क देणारा आणि घेणारा
दोघांनाही तो कळत नाही
श्रवण म्हणजे मला वाटतं
प्राजक्ताचे दिवस
स्रुष्टिने कधीतरी करून
फेडलेला नवस
शब्द हा शेवटचा उपाय आहे
प्रश्नांचं उत्तर मिळायला
नाहीतर एक कटाक्ष पुरतो
मनातलं गुज कळायला
मनाची तहान
पाण्यानं भागत नाही
हे बरं आहे की सगळ्यानाच
मनाची तहान लागत नाही
मला एक सुखी माणूस
त्याची दु:ख सांगत बसला
आणि माझा दाटून आलेला अश्रु
मी निमुटपणे पुसला
त्याच्याकडे काय मागायचं
हेच आपल्याला कळत नाही
म्हणुन बाकी सगळ मिळत राहतं
नेमकं जे हवं त्या कधी मिळत नाही
पुढे अथांग पसरलेला सागर
मागे पसरलेला माझा गाव
मधे मी ठिपक्या एवढा
तरी मला माझं असं नाव
पहाटेआधी जाग येणं
किती त्रासदायक असतं
सोसून झालेलं आयुष्य
उघड्या डोळ्याना दिसतं
एक निरंतर प्रवास सुरु होतो
माझ्याकडून माझ्याकडे
आणि तुला वाटतं मी निघालो
पाठ फिरवून तुझ्याकडे
तू क्षितिजासारखा......
जवळ यायला लागलं की लांब राहतोस
आणि यायचं थांबलं की
आशेने पाहतोस
तू इथून दूर गेल्यानंतर,
अनेक वाटा माज्या आहेत,
पण पावला पावलावर
आठवणी मात्र तुज्याच आहेत.
चारोळ्या
देवळात जाणाऱ्या प्रत्येकाची
झोळी फाटलेली असते
देवाने त्यात कितीही सुखं टाकली
तरी मनीषा हि अपुरीच असते.
वादळात सापडलेल्या जहाजाला
किनाऱ्याचा विचार पडत नसतो
बुडतानाही कसे तरता येईल
याची शर्त करत असतो.
माझ्या मनाचा पिंजरा
मला नेहमी मोकळा वाटतो
कारण , मी त्या पिंजऱ्यात
मलाच अडकलेला पाहतो .
केव्हातरी मारायचं म्हणून
कोणी जगणं सोडून देत नाही
केव्हातरी रडायचं म्हणून कोणी
हसणं सोडून देत नाही.
दुरून पाहिल्यावर वाटतं
तार्यांमध्ये किती एकी असते
जवळून पाहिल्यावर कळत
कि ,ते किती एकटे असतात.
तिच्या आठवणी
आज शांत एकांती
येति आज शांत एकांती
येति तिच्या आठवणी
आठवते सारे...सारे
गुणगुणले होते कुणी...
गुणगुणले होते कुणी----
मुग्ध कळी उमलली
उमलली तुझ्याचसाठी;
तुझ्याचसाठी वेडी कुणी!
तुझ्याचसाठी वेडी कुणी,
तुझ्या कळते नकळत;
कळते न तुला वेड्या,
गाते ती रे प्रेमगाणी!
प्रेमगाणी विरली अन्
अन् आर्त सूर आता
उरलेले रेंगाळती---
आज शांत एकांती...
आठवते सारे...सारे
गुणगुणले होते कुणी...
गुणगुणले होते कुणी---
मुग्ध कळी उमलली
उमलली तुझ्याचसाठी;
तुझ्याचसाठी वेडी कुणी!
तुझ्याचसाठी वेडी कुणी,
तुझ्या कळते नकळत;
कळते न तुला वेड्या,
गाते ती रे प्रेमगाणी!
प्रेमगाणी विरली अन्
अन् आर्त सूर आता
उरलेले रेंगाळती---
आज शांत एकांती... Read more...
*** नव वर्षाचे गाणे ***
_./’\._¸¸.•¤**¤•.¸.•¤**¤•.
*•. .•*** नव वर्षाचे गाणे **
/.•*•.\ ¸..•¤**¤•.,.•¤**¤•.
ये रे दोस्ता
ये रे दोस्ता
सरत्या वर्षाच्या काठावर
नव वर्षाचे गाणे गाऊ , उमेदीच्या तालावर..
बघ सांज उभी
बघ दूर नभी
ध्रुव तारा चम चम चम
ये रे दोस्ता, ये रे दोस्ता..
चल स्वप्न रंगवू
चल पंख पसरवू
नृत्य सुखांचे छन छन छन
ये रे दोस्ता, ये रे दोस्ता..
देऊ भाव स्वरांना
देऊ अर्थ शब्दांना
गंध फुलांचा घम घम घम
ये रे दोस्ता, ये रे दोस्ता..
बोलू बोल नितीचे
बोलू बोल प्रितीचे
जग जिंकूया चल चल चल
ये रे दोस्ता, ये रे दोस्ता..
नव वर्षाचे गाणे गाऊ , उमेदीच्या तालावर.. Read more...
ही गुलाबी हवा वेड लावी जीवा
Monday, December 21, 2009
ही गुलाबी हवा वेड लावी जीवा
हाय् श्वासातही ऐकु ये मारवा
तार छेडी कुणी रोमरोमातुनी
गीत झंकारले आज माझ्या मनी
सांज वाऱ्यातही गंध दाटे नवा
का कुणी रंग हे उधळले अंबरी
भान हरपून मी कावरी बावरी
का कळेना तरी बोलतो पारवा
गीत - गुरु ठाकुर
हिरवा निसर्ग हा भवतीने
हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे
गीत गा रे, धुंद व्हा रे
नवे पंख पसरा
उंच उंच लहरा
भिरभिरणारे, गीत गा रे
गीत गा रे, धुंद व्हा रे
गुलाबी हवा अशी
मंद मंद वाहते
शराबी कळी अशी
चिंब चिंब नाहते
सुगंधी फुलांना नशा आज आली
सडा शिंपिला हा जणू प्रितीने
नव्या संगितातले
तराणे नवे असे
कुणी सोबती मला
मिळाया हवे असे
जन्म हे जगावे, विश्व हे बघावे
एकरूप व्हावे संगसाथीने
गीत - जगदीश खेबूडकर
माझ्या मना रे ऐक जरा
माझ्या मना रे ऐक जरा
हळवेपणा हा नाही बरा !
मधुमास तो मधुयामिनी,
दिसले कुणी हसले कुणी
पहिलाच तो क्षण जीवनी
पडली कशी मज मोहिनी ?
का भास तो होईल खरा ?
आवेग तो श्वासातला
ते ओठ होते कापरे
उभयांतला उपचारही
विरली क्षणातच अंतरे
गेला अचानक तोल पुरा !
फसवेच ते वय कोवळे
फसव्याच त्या संवेदना
स्वप्नास निर्दय जाग ये
मागे मुक्या उरल्या खुणा
अंधार येई काय भरा
गीत - शांता शेळके
परी म्हणू की सुंदरा
परी म्हणू की सुंदरा
तिची तऱ्हा असे जरा निराळी
तिची अदा करी फिदा
ही मेनका कुणी जणु निघाली
तिचे वळून पाहणे, मधाळ गोड बोलणे
कधी खट्याळ हासणे, हळूच जीभ चावणे
मोकळा करुन मीच हे कधीच दिल तिच्या हवाली
हजारदा ती भेटते, बोलू बोलू वाटते
बोलणे मनातले परि मनीच राहते
मोहिनी तिची अशी फुले जशी हजार भोवताली
दिस चार झाले मन,
दिस चार झाले मन, पाखरू होऊन
पानपान आर्त आणि झड बावरून
सांजवेळी जेव्हा येई आठव आठव
दूर कुठे मंदिरात होई घंटारव
उभा अंगावर राही काटा सरसरून
नकळत आठवणी जसे विसरले
वाटेवर इथे तसे ठसे उमटले
दूर वेडेपिसे सूर सनईभरून
झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा
आता जरी आला इथे ऋतु वसंताचा
ऋतु हा सुखाचा इथला गेला ओसरून
गीत - सौमित्र
आभास हा..
कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवा
कसा सावरू मी; आवरू ग मी स्वत:
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !
क्षणात सारे उधाण वारे, झुळुक होऊन जाती
कधी दूर तू ही, जवळ वाटे पण, काहीच नाही हाती
मी अशीच हासते; उगीच लाजते, पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला बाहते; तुझ्याचसाठी सजते
तू नसताना असल्याचा खेळ हा;
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !
मनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस, तसाच नाहीस, आहेस तू खरा कसा रे
तू इथेच बस न, हळूच हस न, अशीच हवी मला तू
पण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू
नवे रंग सारे नवी वाटे ही हवा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !
आई भवानी तुझ्या कृपेने
आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये ....
गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये
उधं उधं उधं उधं उधं !
गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ
हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संभळ
धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता
भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये ....
गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये
उधं उधं उधं उधं उधं !
अग सौख्यभरीला माणिक मोती मंडप आकाशाचा
हात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचा
अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला
महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला
आज आम्हावरी संकट भारी धावत ये लौकरी
अंबे गोंधळाला ये
गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये
अंबाबाईचा ..... उधं उधं उधं उधं उधं
बोल भवानी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं
सप्तशृंगी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं
गीत - दासू
’आई !’ म्हणोनी कोणी
’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.
चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई
शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’
ताईस या कशाची । जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला । समजे न यात काही
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’
आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे
गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला
येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे
गीत - यशवंत
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
दहा दिशांनी, दहा मुखांनी, आज फोडिला टाहो,
आसवांत या भिजली गाथा, श्रोते ऐका हो !
माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
गंगेवानी निर्मळ होतं, असं एक गाव
सुखी समाधानी होतं, रंक आणि राव
त्याची गुणगौरवानं किर्ती वाढली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
अशा गावि होता एक भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणती त्याला, कुणी म्हणे संत
त्याला एका मेनकेची दृष्ट लागली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली
गावासाठी नर्तकीला, नदीपार केली
नार सूड भावनेनं, उभी पेटली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
पिसाळलेल्या नागिणीने थयथयाट केला
नाचगाण्यासाठी सारा गाव येडा झाला
त्यांनी लाज भीड निती सारी सोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
जाब विचाराया गेला, तिने केला डाव
भोवऱ्यात शृंगाराच्या सापडली नाव
त्याच्या पतंगाची दोरी तिने तोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
खुळ्या जीवा कळला नाही, खोटा तिचा खेळ
तपोभंग झाला त्याचा पुरा जाई तोल
त्याला कुत्र्या-मांजराची दशा आणली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
जन्मभरी फसगत झाली, तिचा हा तमाशा
जळुनिया गेली आता जगायाची आशा
आज हुंदक्यानं भैरवी मी गायिली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
याची देही याची डोळा पाहिले मरण
मीच माझ्या हाती देवा रचिले सरण
माझ्या कर्मसोहळ्याची यात्रा चालली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
गीत - जगदीश खेबूडकर
मन उधाण वाऱ्याचे
Saturday, December 19, 2009
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !
आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन् क्षणात फिरुनी आभाळाला भिडते !
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !
रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते,
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ?
कधी मोहच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते !
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते !
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !
किती झाले.. ?
किती झाले.. ?
रात्री बायको बरोबर गाडी वरुन घरी जाताना
ती खोडकर आवाजात सांगू लागते
आमच्याच घरच्या खाणाखूणा...
' हां.. आता इथून डावीकडे... आता सरळ..
त्या मारुती पासून उजवीकडे वळा..
थोडी पुढे घ्या अजुन... पांढर्या गेटपाशी थांबवा...
हां... बास बास... इथेच... '
आणि मग उतरत, पर्स काढत
विचारते हसत हसत - ' हां... किती झाले ? '
८४ लक्ष तर झालेच की प्रीये !
हा तरी शेवटचा की नव्या जन्मवर्तुळाचा हा प्रारंभ ... ठाउक नाही !
गतजन्माचे आठवत नसेलही काही आपल्याला,
पण तेंव्हाही असतील असेच तुझे जन्मप्रामाणिक हसरे क्षण
आणि माझे अंतःस्थ उदासीन प्रश्न काही !!
आता पर्स काढलीच आहेस तर ठेव हातावर
एखादी साखरहळवी टॉफी...
गोड चविने सरु दे अजुन एक रात्र...
अंधारातच चढायचा आहे एक एक जिना...
हातात हात तेवढा राहू दे फक्त....
तो प्रवास कसला होता..........
तो प्रवास कसला होता..........
तो प्रवास कसला होता, मी स्वत:स पुसुनी थकलो
तू प्रारंभच ना केला; अन मी अर्ध्यातुन वळलो !
तुजवरी लावला जिव... हे मुळात चुकले माझे
मी पाउस हुडकायाला ग्रिष्माच्या गावा शिरलो !
कधी जनातुनी... कधी विजनी.. कधी नयनी.. मनात अंति !
कधी तुला शोधण्यासाठी बघ कुठवर वनवन फिरलो...
दिनरात धाडली तुजला मी निमंत्रणे कवितांची
पण खरेच आलीस तेव्हा शब्दांच्या मागे दडलो
मेंदिभरल्या हाताने सनईचे वेचीत सुर
तू सुखात रडलीस तेव्हा मी उदास होउन हसलो...
दमलेल्या बापाची ही कहाणी
अग्गोबाई-ढग्गोबाई" या अल्बममधल्या "दूर देशी गेला बाबा" या स्वतःच्याच गाण्याला उत्तर म्हणून वडीलांच्या भूमिकेतून "दमलेल्या बापाची ही कहाणी तुला" हे गाणं संदीपनी नुकतंच लिहीलेलं आहे. "आयुष्यावर बोलू काही" च्या ५०० व्या भागात संदीप-सलीलनी हे गाणं पहिल्यांदा सादर केलं:
(सलीलचा आवाज) पद्य:
कोमेजून निजलेली एक परी राणी
उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना.....
आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा तरी लोकलची वारी
रोज सकाळीच राजा निघताना बोले
गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परि येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी
खर्याखुर्या परीसाठी गोष्टीतली परी
मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
(संदीपचा आवाज) गद्य:
ऑफिसात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी
(सलीलचा आवाज) पद्य:
उधळत खिदळत बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हसूनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना...
(संदीपचा आवाज) गद्य:
दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी
(सलीलचा आवाज) पद्य:
कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला
आईपरी वेणी फणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा
तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची या कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
(संदीपचा आवाज) गद्य:
बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्त,जवळ पहायचंच राहिलं
(सलीलचा आवाज) पद्य:
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना.... Lips Sealed
--- संदीप खरे
• सागरा प्राण तळमळला •
Friday, December 18, 2009
• सागरा प्राण तळमळला •
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धूतां ।
मी नित्य पाहिला होता ॥
मज वदलासी अन्य देशी चल जाऊं ।
सृष्टिची विविधता पाहूं ॥
तइं जननीहृद् विरहशंकितही झाले ।
परि तुवां वचन तिज दिधले ॥
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन ।
त्वरित या परत आणीन ॥
विश्वसलो या तव वचनीं । मी
जगदनुभवयोगें बनुनी ॥ मी
तव अधिक शक्त उद्धरणीं । मी
येइन त्वरे, कथुन सोडिले तिजला
सागरा प्राण तळमळला ॥ १ ॥
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं ।
ही फसगत झाली तैशी ॥
भूविरह कसा सतत साहुं यापुढती ।
दशदिशा तमोमय होती ॥
गुणसुमनें मी वेचियली या भावें ।
की तिने सुगंधा घ्यावें ॥
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा ॥
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे ॥
तो बाल गुलाबहि आतां ॥ रे
फुलबाग मला, हाय पारखा झाला ।
सागरा प्राण तळमळला ॥ २ ॥
मुलगी मराठी
Thursday, December 17, 2009
कंपनीमधे अनेक सुंदर मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.
कंपनीमध्ये मुली जीन्स घालुन येतात,
पण जि जीन्स बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.
कंपनीमधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते
कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते
शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते
प्रेम सगळे करतात
पण आयुष्यभर जी कुठ्ल्याही परीस्थीमध्ये
जी प्रेमाने साथ् देते
ती मुलगी मराठी असते...
जय जय महाराष्ट्र माझा
Tuesday, December 15, 2009
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
रिमझिम धून, आभाळ भरुन
रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण ?
मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून
गूज मनीचे मनाला, आठवूनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला, उगाच मनात बावरुन
वार्यात गाणे कुणाचे, गाण्यात वारे मनाचे
मनाच्या वार्यात आता, सुरात तुला मी कवळून
झाडाखाली बसलेले
झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले
चिंब मनी आज पुन्हा, आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले
वार्यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला
पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला
गंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटपले
पाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा
खूप जुन्या आज पुन्हा, डोळयात थेंबखुणा
होऊनिया धुंद खरे, आज पुन्हा गार झरे येथे झरझरले
काही कळया, काही फूले, काही झूले हलले
काही मनी, काही तनी, काही नवे फुलले
वावरुनी आज कुणी, सावरुनी आज कुणी, येथे थरथरले
मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?
वार्याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का?
मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?
दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का?
मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?
यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?
पाणी झरत चालल
पाणी झरत चालल
पाणी झरत चालले आज आभाळ फाटले
पावसाला पावसाने वर ढगात गाठले
पाणी झरत चालले झाड झाडाच्या मीठीत
आता झाडाच्या भवती रान आगीच्या ढगीत
पाणी झरत चालले नदी सागर भरती
वाळू ओलावली सारी दोन्ही किनारयावरती
पाणी झरत चालले उभ्या रानाला तहान
पाणी झरत चालले उभ्या रानाला तहान
आता किलबिलताहे झाडाझाडातून पाखरं
पाणी झरत चालले आज आभाळ फाटले
पावसाला पावसाने वर ढगात गाठले
तुला जमणारे का?
तुला जमणारे का?
पापण्या ओल्या माझ्यापासून लपवायला
तुला जमणारे का?
माझ्याशिवाय असे दूर दूर राहायला
तुला जमणारे का?
माझ्या आठवणी विसरायला
एक गोष्ट मात्र तुला नक्की जमेल..
तुला जमणारेय माझ्यासाठी अश्रू ढाळायला
अश्रू आले म्हणजे
त्यातून खर प्रेम ओथम्बेल ..
जरा वेळ ते आधी
पापणी आडच थांबेल..
मग विचारेल हृदयाला..
कि जावू का गालावर?
विरह दिसतोय स्पष्ट मला..
तुझ्या भाळावर….
एक मुलगी...
एक मुलगी...
म्हणाल तर भोळी, म्हणाल तर खुळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...
ति रुसते, ति हसते, ति बड बड बडबडते,
कधी हळव्या, कधी फुंद, कविता सुन्दर करते..
हसता हसता गाली तिच्या,पड़ते सुन्दर खळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...
ति प्रेमळ, ति सोज्वळ, पण आहे भलतिच हट्टी,
राग, द्वेष, लोभीपणाशी, तिची कायमचिच कट्टी..
सगळ्यान्मधे असुनसुद्धा, सगळ्याहून वेगळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...
निळे डोळे, लाल ओठ, पाठीवर रुळती बटा,
गौर गुलाबी चर्येवर, उष:कालची छटा..
ति अशी, ति तशी, जणु ती सोनसळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...
रघुराजाच्या नगरीं जाउन
Monday, December 14, 2009
रघुराजाच्या नगरीं जाउन
गा बाळांनो, श्रीरामायण
मुनिजन-पूनित सदनांमधुनी
नराधिपांच्या निवासस्थानी
उपमार्गांतुन, राजपथांतुनि
मुक्त दरवळो, तुमचें गायन
रसाळ मूलें, फलें सेवुनी
रसाळता घ्या स्वरांत भरुनी
अचुक घेत जा स्वरां मिळवुनी
लय-तालांचें पाळा बंधन
नगरिं लाभतां लोकमान्यता
जाइल वार्ता श्रीरघुनाथां
उत्सुक होउन श्रवणाकरितां
करवितील ते तुम्हां निमंत्रण
सर्गक्रम घ्या पुरता ध्यानीं
भाव उमटुं द्या स्पष्ट गायनीं
थोडें थोडें गात प्रतिदिनीं
पूर्ण कथेचें साधा चित्रण
नका सांगुं रे नाम ग्राम वा
स्वतःस माझे शिष्य म्हणवा
स्वरांत ठेवा हास्य गोडवा
योग्य तेवढें बोला भाषण
स्वयें ऐकतां नृप शत्रुंजय
संयत असुं द्या मुद्रा अभिनय
काव्य नव्हे, हा अमृतसंचय
आदरील त्या रघुकुलभूषण
नच स्वीकरा धना कांचना
नको दान रे, नको दक्षिणा
काय धनाचें मूल्य मुनिजनां ?
अवघ्या आशा श्रीरामार्पण
मज सांग लक्ष्मणा, जाउं कुठें ?
मज सांग लक्ष्मणा, जाउं कुठें ?
पतिचरण पुन्हां मी पाहूं कुठें ?
कठोर झाली जेथें करुणा
गिळी तमिस्त्रा जेथे अरुणा
पावक जिंके जेथें वरुणा
जें शाश्वत त्याचा देंठ तुटे
व्यर्थ शिणविलें माता जनका
मी नच जाया, नवे कन्यका
निकषच मानीं कासें कनका
सिद्धीच तपाला आज विटे
अग्नी ठरला असत्यवक्ता
नास्तिक ठरवी देवच भक्ता
पतिव्रता मी तरि परित्यक्ता
चरणिंच्या धरेसी कंप सुटे
प्राण तनुंतुन उडूं पाहती
अवयव कां मग भार वाहती ?
बाहतसे मज श्रीभागिरथी
अडखळें अंतिंचा विपळ कुठें ?
सरलें जीवन, सरली सीता
पुनर्जात मी आतां माता
जगेन रघुकुल-दीपाकरितां
फल धरीं रूप हे, सुमन मिटें
वनांत विजनीं मरुभूमीवर
वाढवीन मी हा वंशांकुर
सुखांत नांदो राजा रघुवर
जानकी जनांतुन आज उठे
जाई देवरा, पुरा मागुती
शरसे माझे स्वर मज रुपती
पती न राघव, केवळ नृपती
बोलतां पुन्हां ही जीभ थटे
इथुन वंदितें मी मातांना
प्रणाम पोंचवि रघुनाथांना
आशिर्वच तुज घे जातांना
आणखी ओठिं ना शब्द फुटे
ओठांत थांबुनी सशब्द आशा लाजे
ओठांत थांबुनी सशब्द आशा लाजे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका, माझे
मज उगा वाटतें वनीं विहरा जावें
पांखरांसारखे मुक्त स्वरांनीं गावें
कानांत बांसरी वंशवनांतिल वाजे
वाटतें धरावें कुशींत पाडस भोळें
मज आवडती ते विशाल निर्मळ डोळे
चुंबीन त्यास मी, भरविन चारा चोजें
वल्कलें भिजावीं जळांत माझीं सारीं
घागरी कटीवर, करांत घ्यावी झारी
मस्तकीं असावें दुजा घटाचें ओझें
वाटतें खणावें, कंदमुळें काढावीं
तीं हलक्या हातें लीलेनें सोलावीं
चाखून बघावें अमृतान्न तें ताजें
सांजेस बसावें आम्रतरूच्या खालीं
गळतील सुगंधित जधीं मंजिऱ्या भालीं
करतील गर्जना दुरुन वनाचे राजे
घेऊन धनुतें, बांधुन भाता पाठीं
वाटतें फिरावें वनांत मृगयेसाठीं
पाडीत फिरावें दिसेल श्वापद जें जें
वाटतें प्रभातीं बसुनी वेदीपाशीं
वेदांत करावा प्रकांड अध्वर्यूशी
लालिमा मुखावर यावा पावकतेजें
कां हंसतां ऐसें मला खुळीला देवा ?
एवढा तरी हा हट्ट गडे पुरवावा
का विनोद ऐसा प्रिया, अवेळीं साजे ?
प्रभो, मज एकच वर द्यावा
प्रभो, मज एकच वर द्यावा
या चरणांच्या ठायीं माझा निश्चल भाव रहावा
कधिं न चळावे चंचल हें मन
श्रीरामा, या चरणांपासुन
जोंवरि भूवर रामकथानक तोंवर जन्म असावा
रामकथा नित वदनें गावी
रामकथा या श्रवणीं यावी
श्रीरामा, मज श्रीरामाविण दुसरा छंद नसावा
पावन अपुलें चरित्र वीरा
सांगुं देत मज देव अप्सरा
श्रवणार्थी प्रभु, अमरपणा या दीनासी यावा
मेघासम मी अखंड प्राशिन
असेल तेथुन श्रीरामायण
मेघापरि मी शतधारांनीं करीन वर्षावा
रामकथेचें चिंतन गायन
तें रामांचें अमूर्त दर्शन
इच्छामात्रें या दासातें रघुकुलदीप दिसावा
जोंवरि हें जग, जोंवरि भाषण
तोंवरि नूतन नित रामायण
सप्तस्वरांनी रामकथेचा स्वाद मला द्यावा
असंख्य वदनें, असंख्य भाषा
सकलांची मज एकच आशा
श्रीरामांचा चरित्र-गौरव त्यांनी सांगावा
सूक्ष्म सूक्ष्मतम देह धरुनी
फिरेन अवनीं, फिरेन गगनी
स्थलीं स्थलीं पण रामकथेचा लाभ मला व्हावा
त्रिवार जयजयकार, रामा,
त्रिवार जयजयकार, रामा, त्रिवार जयजयकार
पुष्पक यानांतुनी उतरलें स्वर्गसौख्य साकार
तुला चिंतिते सुदीर्घ आयु
पुण्यसलीला सरिता सरयु
पुलकित पृथ्वी, पुलकित वायु
आज अहल्येपुरी जाहला नगरीचा उद्धार
शिवचापासम विरह भंगला
स्वयंवरासम समय रंगला
अधिर अयोध्यापुरी मंगला
सानंदाश्रू तुला अर्पिते दृढ प्रीतीचे हार
तव दृष्टीच्या पावन स्पर्षे
आज मांडिला उत्सव हर्षे
मनें विसरलीं चौदा वर्षे
सुसज्ज आहे तव सिंहासन, करी प्रभो स्वीकार
तुझ्या मस्तकी जलें शिंपतां
सप्त नद्यांना मिळो तीर्थता
अभिषिक्ता तुज जाणिव देतां
मुनिवचनांचा पुन्हां होउं दे अर्थासह उच्चार
पितृकामना पुरी होउं दे
रामराज्य या पुरीं येउं दे
तें कौसल्या माय पाहुं दे
राज्ञीसह तूं परंपरेनें भोग तुझा अधिकार
प्रजाजनीं जें रचिलें स्वप्नीं
मूर्त दिसे तें स्वप्न लोचनीं
राजा राघव, सीता राज्ञी
चतुर्वेदसे लोक पूजिती रघुकुलदीपक चार
रामराज्य या असतां भूवर
कलंक केवल चंद्रकलेवर
कज्जल-रेखित स्त्रीनयनांवर
विचारांतलें सत्य आणतिल अयोध्येंत आचार
समयिं वर्षतिल मेघ धरेवर
सत्यशालिनी धरा निरंतर
सेवारत जन, स्वधर्मतत्पर
"शांतिः शांतिः" मुनी वांछिती, ती घेवो आकार
लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची
लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची
स्वामिनी निरंतर माझी, सुता ही क्षमेची
ज्ञात काय नव्हतें मजसी हिचें शुद्ध शील ?
लोककोप उपजवितो का कधी लोकपाल ?
लोकमान्यता ही शक्ती लोकनायकांची
अयोध्येस जर मी नेतों अशी जानकीतें
विषयलुब्ध मजसी म्हणते लोक, लोकनेते
गमावून बसतो माझ्या प्रीत मी प्रजेची
प्रजा रंजवीतों सौख्यें तोच एक राजा
हेंच तत्व मजसी सांगे राजधर्म माझा
प्रजा हीच कोटी रूपें मला ईश्वराचीं
प्राणही प्रसंगी देणे प्रजासुखासाठी
हीच ठाम श्रद्धा माझ्या वसे नित्य पोटीं
मिठी सोडवूं मी धजलों म्हणुन मैथिलीची
वियोगिनी सीता रडतां धीर आवरेना
कसे ओलवूं मी डोळे ? उभी सर्व सेना
पापण्यांत गोठविली मी नदी आसवांची
राम एक हृदयीं आहे सखी जानकीच्या
जानकीविना ना नारी मनीं राघवाच्या
शपथ पुन्हां घेतों देवा, तुझ्या पाउलांची
विषयलोभ होता जरि त्या वीर रावणातें
अनुल्लंघ्य सीमा असती क्षुब्ध सागरातें
स्पर्शिलीं तयें ना गात्रें हिच्या साउलीचीं
अग्निदेव, आज्ञा अपुली सर्वथैव मान्य
गृहस्वामिनीच्या दिव्यें राम आज धन्य
लोकमाय लाधे फिरुनी प्रजा अयोध्येची
किती यत्नें मी पुन्हां पाहिली तूंते
किती यत्नें मी पुन्हां पाहिली तूंते
लीनते, चारुते, सीते
संपलें भयानक युद्ध
दंडिला पुरा अपराध
मावळला आतां क्रोध
मी केलें जें, उचित नृपातें होतें
घेतले रणीं मी प्राण
नाशिला रिपू, अवमान
उंचावे फिरुनी मान
तव भाग्यानें वानर ठरले जेते
शब्दांची झाली पूर्ती
निष्कलंक झाली कीर्ति
पाहिली प्रियेची मूर्ति
मी शौर्यानें वांकविलें दैवातें
तुजसाठीं सागर तरला
तो कृतार्थ वानर झाला
सुग्रीव यशःश्री ल्याला
सुरललनाही गाती मंगल गीतें
हें तुझ्यामुळें गे झालें
तुजसाठी नाहीं केलें
मी कलंक माझे धुतले
गतलौकिक गे लाभे रघुवंशातें
जो रुग्णाइत नेत्रांचा
दीपोत्सव त्यातें कैचा ?
मनि संशय अपघाताचा
मी विश्वासूं केवि तुझ्यावर कांते ?
तो रावण कामी कपटी
तूं वसलिस त्याच्या निकटीं
नयनांसह पापी भृकुटी
मज वदवेना स्पष्ट याहुनी भलतें
मी केलें निजकार्यासी
दशदिशा मोकळ्या तुजसी
नच माग अनुज्ञा मजसी
सखि, सरलें तें दोघांमधलें नातें
देवहो, बघा रामलीला
देवहो, बघा रामलीला
भूवरी रावणवध झाला
दाहि दिशांचीं मुखें उजळलीं
कंपरहित ती अवनी झाली
रविप्रभेतें स्थिरता आली
पातली महद्भाग्यवेला
’साधु साधु’ वच वदती मुनिवर
छेडुं लागले वाद्यें किन्नर
प्रमोद उसळे भूलोकावर
सुरांचा महारिपू मेला
रणीं जयांचे चाले नर्तन
नृपासहित हे विजयी कपिगण
श्रीरामांचे करिती पूजन
वाहुनी फुलें, पर्णमाला
’जय जय’ बोला उच्चरवाने
कल्पतरूंचीं फेका सुमनें
फेका रत्नें, मणीभूषणें
जयश्री लाभे सत्याला
श्याम राम हा धर्मपरायण
हा चक्रायुध श्रीनारायण
जगदुत्पादक त्रिभुवनजीवन
मानवी रामरूप ल्याला
हा उत्पत्ति-स्थिति-लयकारक
पद्मनाभ हा त्रिभुवनतारक
शरण्य एकच खलसंहारक
आसरा हाच ब्रम्हगोलां
वत्सलांछना धरुनी वक्षीं
संतसज्जनां हा नित रक्षी
हा सत्याच्या सदैव पक्षीं
जाणतो हाच एक याला
हा श्री विष्णू, कमला सीता
स्वयें जाणता असुन, नेणता
युद्ध करी हें जगताकरितां
दाखवी अतुल रामलीला
आज कां निष्फळ होती बाण ?
आज कां निष्फळ होती बाण ?
पुण्य सरें कीं सरलें माझ्या बाहूंमधलें त्राण ?
शरवर्षावामाजीं दारुण
पुन्हां तरारे तरुसा रावण
रामासन्मुख कसे वांचती रामरिपूचे प्राण ?
चमत्कार हा मुळिं ना उमजे
शीर्ष तोडितां दुसरें उपजें
रावणांग कीं असे कुणी ही सजिव शिरांची खाण ?
शत शिर्षे जरि अशीं तोडिलीं
नभीं उडविलीं, पदीं तुडविलीं
पुन्हां रथावर उभाच रावण, नवें पुन्हां अवसान
इंद्रसारथे, वीर मातली
सांग गूढता मला यांतली
माझ्याहुन मज असह्य झाला विद्येचा अपमान
वधिला खर मी, वधिला दूषण
वधिला मारिच, विराध भीषण
हेच बाण ते केला ज्यांनी वाली क्षणिं निष्प्राण
ज्यांच्या धाकें हटला सागर
भयादराचे केवळ आगर
त्या भात्यांतच विजयि शरांची आज पडे कां वाण ?
सचैल रुधिरें न्हाला रावण
सिंहापरि तरि बोले गर्जुन
मलाहि ठरला अवध्य का तनुधारी अभिमान ?
सचिंत असतिल देव, अप्सरा
सुचेल तप का कुणा मुनिवरा ?
व्यर्थच झालें काय म्हणूं हें अवघें शरसंधान ?
योग्य समयिं जागविलें बांधवा, मला
योग्य समयिं जागविलें बांधवा, मला
लंकेवर काळ कठिण आज पातला
पाप्याप्रति आत्मघात
दुष्कर्त्म्या नरकपात
अटळचि जो नियतीनें नियम योजिला
तव मानसिं आत्मगर्व
विषमय तव आयु सर्व
बोधशब्द कधिं न मधुर तुजसिं लागला
विभिषणकृत सत्यकथन
अप्रिय परि पथ्य वचन
झिडकारुन एक आप्त तूंच हरविला
मंदोदरि विनवी नित
हित गमलें तुजसि अहित
भाव तिचा पायतळीं व्यर्थ तुडविला
पाहुनिया देश समय
पडताळुन न्याय, अनय
कार्याप्रति हात कधीं तूं न घातला
मनिं आला तो निर्णय
ना विचार वा विनिमय
सचिव कुणी पारखुनी तूं न पाहिला
प्रिय तितकें ऐकलेंस
अप्रिय तें त्यागिलेंस
यांत घात तूंच तुझा पूर्ण साधिला
उपदेशा हा न समय
लंकेशा, होइ अभय
कर्तव्या कुंभकर्ण नाहिं विसरला
बोलवि मज बंधुभाव
रणिं त्याचा बघ प्रभाव
रिपुरक्तें भिजविन मी आज पृथ्वीला
सहज वध्य मजसि इंद्र
कोण क्षुद्र रामचंद्र !
प्राशिन मी क्षीरसिंधु, गिळिन अग्निला
वचन हाच विजय मान
करि सौख्यें मद्यपान
स्कंधीं मी सर्व तुझा भार घेतला
नभा भेदुनी नाद चालले शंख दुंदुभींचे
नभा भेदुनी नाद चालले शंख दुंदुभींचे
अनुपमेय हो सुरूं युद्ध हें रामरावणांचें
सशंख राक्षसगण तो दिसला
कष्णघनांवर बलाकमला
मुखांतुनी शत गर्जे चपला
रणांगणावर कोसळलें तों पाउस बाणांचे
नाचत थय थय खिंकाळति हय
गजगर्जित करि नादसमन्वय
भीषणता ती जणूं नादमय
त्या नादांतच मिळले पदरव प्लवग-राक्षसांचे
दंत दाबुनी निज अधरांवर
वानरताडण करिती निशाचर
नभांत उडती सदेह वानर
शस्त्र म्हणुन ते घाव घालिती वृक्ष-पर्वतांचे
"जय दाशरथी, जय तारासुत"
प्रहार करिती वानर गर्जत
झेलित शस्त्रां अथवा हाणित
भरास आलें द्वंद्व जणूं कीं महासागरांचे
गदा, शूळ वा लागुन शक्ति
राक्षस वानर घेती मुक्ति
रणांत पडती अपुल्या रक्तीं
’जय लंकाधिप’ घोष घुमविती अरी वानरांचे
द्वीप कोसळे, पडला घोडा
वर बाणांचा सडा वांकडा
’हाणा मारा, ठोका तोडा’
संहारार्थी अर्थ धावती सर्व भाषितांचे
रणांत मरतां आनंदानें
मांसकर्दमीं फुलतीं वदनें
तींहि तुडविलीं जातीं चरणें
रणभूमीवर ओहळ सुटले लाल शोणिताचे
कलेवरावर पडे कलेवर
ऋक्ष, निशाचर, नकळे वानर
मरणांहुनही शौर्य भयंकर
कैक योजनें उडुनी जाती भाग अवयवांचे
चक्रें, चरणें, हस्त, लांगुलें
शुंडा, ग्रीवा, शिरें, पाउलें
पडलें तें शतखण्डित झालें
प्रलयकाळसें अंग थरारे धरणी-गगनाचें
द्वंद्व तरी हो कुठें कुणाचें
काळमुखांतुन कोणी वांचे
कुठे कुणाचें कबंध नाचे
धुमाळींत त्या कोणा नुरलें भानच कोणाचें
जा, झणि जा, रावणास सांग एकदा
जा, झणि जा, रावणास सांग एकदा
शेवटचा करि विचार फिरुन एकदां
नगरद्वारिं राम उभा सिंधु लंघुनी
रणरागीं वानरगण जाय रंगुनी
शरण येइ राघवास सोडुनी मदा
वरलाभें ब्रम्ह्याच्या विसरुनी बला
पाप्या, तूं पीडिलेंस अखिल पृथ्विला
छळिसी तूं देव, नाग, अप्सरा सदा
उतरविण्या गर्व तुझा ठाकला उभा
शौर्याचा सूर्य राम, सैन्य ही प्रभा
जाळिल तव वंश, सर्व राज्य-संपदा
शंखनाद ऐक, देख धरणिकंप ते
तुजसाठीं राक्षसकुल आज संपले
अजुन तरी सोड तृषा तव घृणास्पदा
अंती तरि सोड मूढ वृत्ती आपुली
परतुन दे राघवास देवि मैथिली
शरणागत होइ त्यास, टाळ आपदा
स्थिर राही समरीं रे समय जाणुनी
जातिल तुज रामबाण स्वर्गि घेउनी
वाट उरे हीच एक तुजसि मोक्षदा
नातरि बल मायावी दाव संगरीं
ज्यायोगें हरिली तूं रामसहचरी
वज्राप्रति भिडव बाण, मेरुसी गदा
नामहि तव भूमीवर कठिण राहणें
आपणिली रामकृपा सुज्ञ विभिषणें
लंकेच्या भूषवील तोच नृपपदां
सुग्रीवा, हें साहस असलें
सुग्रीवा, हें साहस असलें
भूपतीस तुज मुळिं न शोभलें
अटीतटीचा अवघड हा क्षण
मायावी तो कपटी रावण
भिडलासी त्या अवचित जाउन
काय घडें तें नाहीं कळलें
विचारल्याविण मला, विभिषणा
सांगितल्याविण मला, लक्ष्मणा
कुणा न देतां पुसट कल्पना
उड्डणा तव धाडस धजलें
ज्ञात मला तव अपार शक्ति
माझ्यावरची अलोट भक्ति
तरीहि नव्हतें योग्य संप्रति
अनपेक्षित हें कांहीं घडले
द्वंद्वे जर तुज वधणें रावण
वृथा जमविलीं सैन्यें आपण
कशास यूथप वा वानरगण
व्यर्थच का हे ऋक्ष मिळविले ?
काय सांगुं तुज, शत्रुदमना
नृप नोळखती रणीं भावना
नंतर विक्रम, प्रथम योजना
अविचारें जय कुणा लाभले ?
तू पौलस्त्यासवें झुंजता
क्षीण क्षण जर एकच येता
सन्मित्राते राघव मुकता
तव सैनिक मग असते खचले
काय लाभतें या द्वंद्वानें ?
फुगता रावण लव विजयानें
लढते राक्षस उन्मादानें
वानर असते परतच फिरले
दशकंठचि मग विजयी होता
मैथलीस मग कुठुन मुक्तता ?
व्यर्थच ठरतीं वचनें शपथा
कुणी राक्षसां असतें वधिलें ?
जा सत्वर जा, जमवी सेना
करी रणज्ञा, सुयोग्य रचना
आप्त-सैन्यासह वधूं रावणा
व्यर्थ न दवडी शौर्य आपुलें
काय ऐकतें ? काय पाहतें ? काय अवस्था ही ?
काय ऐकतें ? काय पाहतें ? काय अवस्था ही ?
रघुवरा, बोलत कां नाहीं ?
जायेआधीं मरण पतीचें, हें कैसें घडलें ?
दैवच अंती तुटुन खड्गसे माझ्यावर पडलें
पुण्यहीन का ठरल्या लोकीं कौसल्यामाई ?
ज्योतिषांचीं ग्रहगणितें का सर्वथैव चुकलीं ?
अभागिनी ही कशी अचानक सर्वस्वा मुकली ?
धुळींत निजले पुरुषोत्तम का या मूढेपायीं ?
ओळखितें मी कमलनेत्र हे, ओळखितें श्रवणें
सरे न का ही झोंप राघवा, दीनेच्या रुदनें ?
गतीहीन कां झाली सृष्टी, सुन्न दिशा दाही ?
सुवर्णधनु हें ओळखिलें पण कुठें महाबाहु ?
श्यामवर्ण ती मूर्त पुन्हां मी कुठें कधीं पाहूं ?
नयन जाहले रडुन कोरडे, अंगाची लाही
विवाहसमयीं शपथ दिली ती विसरलांत सखया !
पुशिल्यावांचुन स्वर्गी गेला सोडुनिया जाया
ऐकलेंत का ? - जनकनंदिनी आर्त तुम्हां बाही
रघुकुलतिलका, तुम्ही भेंटला पितरांना स्वर्गी
परक्या हातीं सजीव उरली अर्धांगी मार्गी
रघुकुलजातें शोभुन दिसली रीत तरी का ही ?
अथांग सागर जिंकुन आला कशास मजसाठीं ?
काय जन्मलें कुलनाशिनि मी धरणींच्या पोटीं ?
जनकें केले यज्ञ, तयांची काय सांगता ही ?
हे लंकेशा, ज्या शस्त्रानें मारविलें नाथां
घाव तयाचा घाल सत्वरीं सीतेच्या माथां
रामामागें तरी जाउं दे अंतीं वैदेही
बांधा सेतू, सेतू बांधा रे सागरीं
बांधा सेतू, सेतू बांधा रे सागरीं
गिरिराजांचे देह निखळूनी
गजांगशा त्या शिळा उचलुनी
जलांत द्या रे जवें ढकलुनी
सेतुबंधने जोडुन ओढा समीप लंकापुरीं
फेका झाडें, फेका डोंगर
पृष्ठीं झेलिल त्यांना सागर
ओढा पृथ्वी पैलतटावर
वडवाग्नी तो धरील माथीं सेतू शेषापरी
रामभक्ति ये दाटुनि पोटीं
शततीर्थांच्या लवल्या पाठी
सत्कार्याच्या पथिकासाठीं
श्रीरामाला असेच घेती वानर पाठीवरी
नळसा नेता सहज लाभतां
कोटी कोटी हात राबतां
प्रारंभी घे रूप सांगता
पाषाणाच हे पहा लीलया तरती पाण्यावरी
चरण प्रभुचे जळांत शिरतां
सकळ नद्यांना येइ तीर्थता
आरंभास्तव अधिर पूर्तता
शिळा होउनी जडूं लागल्या, लाट लाटांवरी
गर्जा, गर्जा हे वानरगण !
रघुपती राघव, पतीतपावन
जय लंकारी, जानकिजीवन
युद्धाआधी झडूं लागु द्या स्फूर्तीच्या भेरी
सेतू नच हा क्रतू श्रमांचा
विशाल हेतु श्रीरामांचा
महिमा त्यांच्या शुभनामाचा
थबकुनि बघती संघकार्य हें स्तब्ध दिशा चारी
भुभुःकारुनी पिटवा डंका
विजयी राघव, हरली लंका
मुक्त मैथिली, कशास शंका
सेतुरूप हा झोतच शिरला दुबळ्या अंधारी
लीलया उडुनी गगनांत
लीलया उडुनी गगनांत
पेटवी लंका हनुमंत
नगाकार घन दिसे मारुती
विजेपरी तें पुच्छ मागुतीं
आग वर्षवी नगरीवरती
गर्जना करी महावात
या शिखराहुन त्या गेहावर
कंदुकसा तो उडे कपीवर
शिरे गवाक्षीं पुच्छ भयंकर
चालला नगर चेतवीत
भडके मंदिर, पेटे गोपुर
द्वार कडाडुन वाजे भेसुर
रडे, ओरडे, तों अंतःपुर
प्रकाशीं बुडे वस्तुजात
जळे धडधडा ओळ घरांची
राख कोसळे प्रासादांची
चिता भडकली जणूं पुराची
राक्षसी करिती आकांत
कुणी जळाले निजल्या ठायीं
जळत जळत कुणि मार्गी येई
कुणि भीतीनें अवाक होई
ओळखी नुरल्या प्रलयांत
माय लेकरां टाकुन धावे
लोक विसरले नातीं नावें
उभें तेवढें पडें आडवें
अचानक आला कल्पांत
खड्गे ढाली पार वितळल्या
वीरवृत्ति तर सदेह जळल्या
ज्वाळेमाजीं ज्वाळा मिळाल्या
सघनता होय भस्मसात
वारा अग्नी, अग्नी वारा,
नुरे निवारा, नाहीं थारा
जळल्या वेशी, जळे पहारा
नाचतो अनल मूर्तिमंत
मुद्रिका अचुक मी ओळखिली ही त्यांची
मुद्रिका अचुक मी ओळखिली ही त्यांची
मज सांग अवस्था दूता, रघुनाथांची
हातांत धनू तें, अक्षय भाता पृष्ठीं
विरहांत काय ते राघव झाले कष्टी ?
कां श्यामल वलयें नयनतळीं चिंतांचीं ?
बसलेत काय ते लावुन कर कर्मातें ?
विसरलेत काय ते दुःखें निजधर्मातें ?
करितात अजुन ना कर्तव्यें नृपतीचीं ?
सोडिले नाहिं ना अजुन तयांनीं धीरा ?
का शौर्याचाही विसर पडे त्या वीरा ?
साह्यार्थ असति ना सैन्यें सन्मित्रांची ?
इच्छिती विजय ना त्यांचा अवघे राजे ?
का लोकप्रीतिला मुकले प्रियकर माझे ?
विसरले थोरवी काय प्रभू यत्नांची ?
का मलाच विसरुन गेले माझे स्वामी ?
मी दैवगतीने पिचतां परक्या धामीं
का स्मृती तयांना छळिते या सीतेची ?
करतील स्वयें ना नाथ मुक्तता माझी ?
धाडील भरत ना सैन्य, पदाती, वाजी ?
कळतसे त्यांस का वार्ता रघुनगरीची ?
का विपत्कालिं ये मोह तयांच्या चित्तीं ?
पुसटली नाहिं ना सीतेवरची प्रीती ?
करतील मुक्तता कधिं ते वैदेहीची ?
त्या स्वर्णघडीची होइन का मी साक्षी ?
कधिं रामबाण का घुसेल रावणवक्षीं ?
वळतील पाउलें कधीं इथें नाथांचीं ?
जोंवरी तयांचें कुशल ऐकतें कानीं
तोंवरी सजिव मी असेन तैशा स्थानीं
जन्मांत कधीं का होइल भेट तयांची ?
नको करूंस वल्गना रावणा निशाचरा !
नको करूंस वल्गना रावणा निशाचरा !
समूर्त रामकिर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां
वंद्नास योग्य मी पराविया पतिव्रता
पुण्य जोड राक्षसा झणीं करुन मुक्तता
लाज राख नारिची वीर तूं जरी खरा
नृपति-पाप पाहतें, अनयनित्य साहतें
राष्ट्र तें जगावरी नाममात्र राहतें
काय आग लाविशी तुझ्या करें तुझ्या पुरा ?
जिथें तिथें दिसे मला लोकनाथ राम तो
शयनिं ये उशातळीं रामहस्तवाम तो
चिंतनांत पूजिते त्याच मी धनुर्धरा
योग्य एक त्यास मी, योग्य ना दुजा कुणा
परत धाड रे मला प्रियासमीप रावणा !
शरण त्यांस रक्षुनी राम देइ आसरा
सख्य जोड त्यासवें, हो कृतार्थ जीवनीं
नित्यशुद्ध जानकी राघवास अर्पुनी
ना तरी मृतीच ये चालुनी तुझ्या घरा
इंद्रवज्रही कधीं चुकेल घाव घालितां
क्षणहि आयु ना तुझे रामचंद्र कोपतां
रामबाणवृष्टि ती प्रळयसी भयंकरा
ठाकतां तुझ्यापुढें वीर युद्धकाम तो
ठेवणार वंश ना असा समर्थ राम तो
अधर्म काममूढ तूं, विचार हा करी जरा
बघेन रामबाण मी निडर या तुझ्या उरीं
कंक पंख पाठिशीं, नामचिन्ह ज्यावरी
भारमुक्त होउं दे एकदां वसुंधरा
हीच ती रामांची स्वामिनी
हीच ती रामांची स्वामिनी
चंद्रविरहिणी जणूं रोहिणी
व्याघ्रींमाजी चुकली हरिणी
श्येन-कोटरीं फसे पक्षिणी
हिमप्रदेशीं थिजे वाहिनी
मलिन, कृशांगी तरी सुरेखा
धूमांकित कीं अग्निशलाका
शिशिरीं तरिं ही चंपकशाखा
व्रतधारिणि ही दिसे योगिनी
रुदनें नयनां येइ अंधता
उरे कपोलीं आर्द्र शुष्कता
अनिद्रिता ही चिंताक्रान्ता
मग्न सारखी पती-चिंतनीं
पंकमलिन ही दिसे पद्मजा
खचित असावी सती भूमिजा
किती दारुणा स्थिती दैवजा !
अपमानित ही वनीं मानिनी
असुन सुवर्णा, श्यामल, मलिना
अधोमुखी ही शशांक-वदना
ग्रहण-कालिंची का दिग्ललना
हताश बसली दिशा विसरुनी
संदिग्धार्था जणूं स्मृती ही
अन्यायार्जित संपत्ती ही
अमूर्त कोणी चित्रकृती ही
परजिता वा कीर्ती विपिनीं
रामवर्णिता आकृति, मुद्रा
बाहुभूषणें, प्रवाल-मुद्रा
निःसंशय ही तीच सु-भद्रा
हीच जानकी जनक नंदिनी
असेच कुंडल, वलयें असलीं
ऋष्यमुकावर होतीं पडलीं
रघुरायांनी तीं ओळखिलीं
अमृत-घटी ये यशोदायिनी