मराठी चारोळ्या

Pages

आज तुझी आठवण येत आहे..

Thursday, April 29, 2010

आज तुझी आठवण येत आहे..
आहे मी जिथे उभा
हाथात होता हात तुझा..
आज त्या रस्त्यावर एकटा उभा आहे
आज तुझी आठवण येत आहे..

दाटून आलेले ढग तो रिमझिम पाउस
एका छत्रीत ते जवळीक साधण..
आज एका आडोश्याला मी उभा आहे..
आज तुझी आठवण येत आहे..

पहाटेची पहिली किरण
तुझं अलगद येऊन केसांचे पाणी उडवण ..
आज पहाट रात्रीपेक्षा भयाण आहे..
आज तुझी आठवण येत आहे..

मधुर चांदण्याची ती रात्र
ऑफिस मधून घरी यायची घाई..
आज दाराचे कुलूप उघडायला घाबरत आहे..
आज तुझी आठवण येत आहे..

तुझ्या प्रेमाने सजलेले ते घर
प्रत्येक कोपर्यात तुझाच भास..
आज तुझ्या एका हाकेस आतुर झालो आहे..
आज तुझी आठवण येत आहे..

असह्य यातनाच ओझ दिलस
डोळ्यातील अश्रू हृदयातूनी वाहतात..
अखेरचा श्वास तुझ्या कुशीत सोडायचा आहे
आज तुझी आठवण येत आहे..

जीवन मुक्तीच साकड देवाकडे घालतोय
हसत हसत मरण याव याची वाट बघतोय
जवळ तुझ्या आज मी येत आहे..
आज तुझी आठवण येत आहे..आठवण येत आहे...

Read more...

सुख आणि दुख

Tuesday, April 27, 2010

सुख आणि दुख हे रस्त्याचे दोन अलग अलग मार्ग आहेत,
एक सुखा कडे जातो तर दुसरा दु:खा कडे येतो,
पण कोणी कोणत्या मार्गाने जायचे हे दैवच ठरवते.

Read more...

माझी माणसे

Saturday, April 24, 2010

माझी माणसे शोधुन दमलो मी
माझी जात जाणुन फसलो मी

माझी भाषा कळेनाच कुणाला इथे
अनोळख्या जनावरांच्या कळपात घुसलो मी

माणंसातला माणुस नाही ओळखला
माझ्याच आरश्यातल्या प्रतिबिंबाला फसलो मी

भावना अन प्रेमाचा दुष्काळच इथे
आयुष्यभर दगडांतच जगलो मी

कुणाला शिकवायची निती-मुल्ये इथे
संस्कार घेउन राक्षसांत वाढलो मी

माझे भविष्यच अंधुक दिसतय आता
मुडदा होउन वर्तमानातच जगलो मी

यमाच्या रेड्याला म्हैस समजलो
मरताना हसलो अन तिथेसुद्धा फसलो मी
************ ***

 Only RooPESH 

 

Read more...

काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं होतं काळीज चोरून!!

नटून थटून आली जेव्हा ती बेस्ट बसमधून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

पाहताच तिला मी एकदम क्लीन बोल्ड झालो…
एप्रिल च्या कडकडीत दुपारी आय ऍम सो कोल्ड झालो!
भूक हरवली, झोप उडाली झालो दिवाना तिज पाहून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

व्हॅलेंटाइन्सला ठरवलं, तिला सांगू मनातली गोष्ट…
पण दुर्भाग्य माझं असं की तिचे भाऊ होते फार धष्टपुष्ट!
गोष्ट राहिली बाजूलाच, आणि आलो मी हनुमान होऊन…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

मी ही हार मानणारा नव्हतो म्हटलं शोधू नवा मार्ग…
तडक जाऊन मग शोधून काढला मी एफवायबीकॉम चा वर्ग!
जे काही पाहिले ते पाहतंच राहिलो डोळे विस्फारून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

विश्वास बसता बसेना की ती वर्गासमोर उभी होती…
एफवाय च्या वर्गाला ती ‘सी प्रोग्रॅमिंग’ शिकवत होती!
जिच्यावर लाईन मारत होतो आलो तिलाच मॅडम म्हणून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं होतं काळीज चोरून!!

कि .

Read more...

हवं ते मिळालं की ,

हवं ते मिळालं की ,
बाळ खुश होऊन जातं . .
बाळ गोड गोड हसून
आपल्याला ही खुलवतं ....

हवं ते मिळालं तरी ,
आपण नाखुशच असतो ...
पळत्याच्या पाठीमागे
सारखे धावत असतो....

आनंदाचा क्षण काही
टिकवून ठेवता येत नाही . .
दैवाला दूषण देवून
हव्यास सोडता येत नाही ....

हृदयात डोकावून पाहिले
तर कारुण्य खूप दिसते...
पण तेवढीच जागा ही
आनंदाने व्यापलेली असते....

जावू नये दु:खाने पोळून
की सुखाने खूप हूरळून ...
शांत शांत वाटेल बघा,
दोघांचा समतोल ठेवून ....

Read more...

"मला एक नवीन क्षितीज सापडलंय".

"मला एक नवीन क्षितीज सापडलंय".
होय,
जीथं सूर्य कधी मावळतच नाही
अन काळोखाला अस्तित्वच नाही
जीथं भूतकाळाच वास्तव्यच नाही
अन आठवणींचा प्रश्नच येत नाही..
होय मला . .. ... ....

जीथं सुख सोबत सोडत नाही
अन दुख: कुठचं दिसत नाही
जीथं प्रेमाला सीमाच नाही
अन मत्सराला थाराच नाही ..
होय मला एक .. ... ....

जीथं आपल्या भावनांना कदर आहे
होरपळलेल्या मनाला मायेचा पदर आहे
जिथली नाती बंधनातील नाहीत
तरीसुद्धा अजून ती सांडलेली नाहीत..
होय,मला एक नवीन ... ....

जीथं मला कोणाचीच भिती नाही
अस्तित्व सांगणारी स्वताची सावलीसुद्धा नाही
जीथं कोणताच ऋतू मला लागू नाही
अन उन-पावसाच खेळ माझ्या जीवनातच नाही..
होय,मला एक नवीन क्षितीज ....

जीथं वाटासुद्धा दुहेरी नाहीत
फक्त पुढ चालायचं माघार मात्र नाही
जीथं प्रश्नचिन्ह कुठचं दिसत नाही
उत्तर मिळेपर्यंत प्रश्नच उरत नाही ..
होय,मला एक नवीन क्षितीज सापडलंय"

Read more...

निशब्द-माझी चारोळी

Friday, April 23, 2010

निशब्द  मी  निशब्द  तू ......
निशब्द  जग  हे  सारे ...
निशब्द  राहून  हि  कुठून  आले ......
प्रेमाचे  हे  थंड  गार  वारे  वारे ............

Read more...

आमचा.......? महाराष्ट्र !!! आणि आमची मराठी ....

आमचा.......? महाराष्ट्र !!! आणि आमची मराठी ....

.
.
.

पर राज्यातील कावळा
महाराष्ट्रातील झाडावर आला
काव काव करत विनंती करू लागला
या झाड़ा वरील कावळ्यानी दिला त्याला
.....आसरा...........
आणि आपल्याच ताटातला दिला त्याला चारा

चारा खाऊन तो कावळा धष्ट पुष्ट झाला
वर्षा नंतर गावाकडे जाण्याचा विचार केला
गावाकडे जाउन युक्ती त्यांन केली
जाताना सोबत घेउन जावी फॅमिली
बायका पोरा सकट तो पुन्हा रवाना झाला
आनंदाने भाड्याच्या घरट्यात राहू लागला
बायका पोर कामा मधे साथ त्याला द्यायचे
थोड्या पगारात खुप कष्ट करायचे
अस करता करता कामाचा बोझा
खुपच वाढला .....
मग काय.... मेहुना, मेहुनी, सासु
सासरे, सगळ्या राज्याचा
संसार.... याच झाडावर रंगला

आता त्या कावळ्याला भाड्याच घर नको होत
आपल स्वत हाच असाव अस सारख वाटत होत
मग काय त्यान ...हुशारी केली
महाराष्ट्रतल्या कावळ्याना
थोड़ी लाच दिली
अलिबाग, बदलापुर , कर्जत , कसारा
सुन्दर अशी हवा
थोड़े फार पैसे घेउन तितेच रहावा
ताजी , ताज़ी फळे रोज रोज खावा

बिचारे कावले मस्त पैकी हसले
आणि त्या लबाडाच्या....बोलण्याला लगेच फसले
...हळु हळु बिचारे खुप खुप थकले
बिचारे भुकेने भलतेच मेले
आपल्याच राज्यात आपले हे हाल झाले .........!!

Read more...

तू नसतेस तेव्हा

तू नसतेस तेव्हा
तू नसतेस तेव्हा काय होते
ते लक्षात राहाण कसं शक्य  आहे.....?
कारण ...........
फक्त श्वास सुरु असतो तेव्हा
बाकी सार सार असते बंद
अगदी लक्षात राहाण सुद्धा.............
ह , तू असतेस तेव्हा
काय काय होत असते
ते मात्र राहत लक्षात....... सगळे.........
कारण ,
तेव्हा असते सार धुंद
अगदी श्वास घेणेसुद्धा .............
अरे हो , आठवल
तेच तर सगळे आठवतो मी
तू नसतेस तेव्हा ....

Read more...

विनोद

शिक्षक : राजू तु जेवण्यापूर्वी प्रार्थना करतोस का ?
राजू : नाही सर, तशी गरज नसते. माझी आई फार चांगला स्वयंपाक करते.

एका माणसाने कार घेण्यासाठी कर्ज घेतल.
ते कर्ज तो फेडू न शकल्याने बॅंकेचे अधिकारी ती कार घेऊन गेले.
यावर तो माणूस म्हणाला,"मला माहीत नव्हत,
नाही तर मी लग्नासाठी पण कर्ज घेतल असतं."

काय असते कॉलेज ?
शाळा व लग्न यामधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण.:)

बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!

निलेश- अरे मला जी मुलगी आवडत होती तिने माझ्याशी लग्न नाही केल रे ...
गौरव - अस का झालं ? पण तू सांगायचं ना कि तुझे काका करोडपती आहेत ते ...
निलेश - सांगितलं ना ... चालू निघाली रे ती, तिने काकाशीच लग्न केलं.. :(

मराठीचा वर्ग सुरू होता
बाईंनी वाक्य सांगितलं,
' समोरून एक खूप सुंदर मुलगी येते आहे.'
या वाक्याचे उद्गारवाचक वाक्यात रूपांतर करा.'
हात वर करून विन्या लगेच उद्गारला,
' आयला आयटम!!!'

डा.पाटिल गेल्या तीन पिढ्या पासून आमचे फॅमिली डाक्टर आहेत हे तू कसेकाय म्हणतोस ?
कसेकाय म्हंजेकाय माझे वडील आजोबा पंजोबा याना त्यांचे हातून च मरण आले या शिवाय काय पुरावा पाहीजे ?

वडील : बाळा, काय करतो आहेस ?
मुलगा : आज शाळेत सरांनी मारल....
वडील : तू काहीतरी चूक केली असशील
मुलगा : नाहीं मी तर चुप चाप झोपलो होतो. :)

ग्राहक ( चिडून ) : वेटर, चिकन बिर्यानी मध्ये चिकनच नाहीये ...
वेटर : साहेब, गुलाब जामुन मध्ये कोणते गुलाब असते ?:)

बायको - जर मी मेले तर ?
नवरा - मी पण मरून जाइल,
बायको - का ?
नवरा - कधी कधी जास्त आनंदसुद्धा माणुस सहन करू शकत नाही.....:)

Read more...

तु असती तर...

Thursday, April 22, 2010

तु असती तर....
फार तर तुझ्यासोबत भांडलो असतो.... खुप
भांडता भांडता अचानक
काहितरी भयान शांतता झाली असती
एखाद्या खोल दरीत आवाज दिल्यावर
परत यावा...! अशी माझी नजर
तुझ्या नजरेला स्पर्शुन परत आली असती
अन् मग हळुच.... तुझ्या तळहातांवर
माझ्या ओठांनी चुंबन फुले ठेवली असती....
अन् मग नकळत.... आपलं भांडण मिटलं असतं....

तु असती तर....
आयुष्यात फार तर एक जीवन असतं
आताही आहे... पण जीव तर तुच घेऊन गेलीस
आता फक्त एक वन राहिलेलं...
संपतच नाही ....चालतो आहे कधीचा
सुर्यही उगतो तुझाच दिवस घेऊन
रात्रही माझी नाही...चंद्रही माझा नाही...
आहे माझा फक्त ... काळोख प्रत्येक रात्रीचा...


तु असती तर...
फार तर एक घरटं आपलं असतं...
त्या घरट्यामध्ये आपल्या स्वप्नांचं
तोरण मी बांधलं असतं
पण तु नाही म्हणुन काय झालं...
घरटं तर अजुनही तसच आहे ह्या मनामध्ये...
बस एक पाखरु वाट चुकून
कुठेतरी उडून गेलं... मध्येच...!!
अन् मी ही विसरून गेलो
माझ्याच घरट्याचं तुटलेलं तोरण पाहुन ...
कि हे माझचं आहे म्हणुन....
तु असती तर...
फार तर मी स्वत:ला विसरलो नसतो..

Read more...

मुंबई - विंदा करंदीकर

Tuesday, April 20, 2010

मुंबई

या उंच हवेल्या ! कां रस्त्यावर पडतां ?
हीं धान्यागारें ! कां तळतळुनी मरतां ?
हीं शीघ्र वाहणे ! रखडत मग का पायी ?
या प्रचंड गिरण्या ! वस्त्र तुम्हा का नाही ?

छे ! नगर नव्हे हें ! हिंदुभूमिच्या शरिरीं
वाटते जहाली जखम भयंकर जहरी;
शेटजी कोठले ? त्यांत किडे लवलवती,
जे शरीर शोषुनि रक्तावरतीं जगती.

जर सूख हिच्यातिल सर्वांसाठीं असते,
ही जखम न असती, भूषण मजला गमतें !

विंदा करंदीकर

Read more...

मैत्रीच्या पलिकड़ल आणि प्रेमाच्या अलिकड़ल नात

Monday, April 19, 2010

....मैत्रीच्या पलिकड़ल आणि प्रेमाच्या अलिकड़ल नात....
मिलालिस तू एक सुन्दर मैत्रिण
आनंद जाला मनाला
जसा होतो पावसाच्या भेटीत धरतीला

फरफटलेले आयुष मज़े तुज्या येण्याने सावरले
होते निवदुंड फ़क्त मनात आधी
आता फुलांचे ताटवे फुलले ...

यशामागे धावताना धरपदलो होतो
अनाथ मी जख्मी मन
दुनियेकडून तुदवलो होतो..

त्यावेळी तूच दिलास मैत्रीचा हाथ
अणि दिलीस लाखमोलाची साथ
तुज्या सहवासात वाढला आत्मविश्वास
आनंदाने घेत जगतो आहे मी आता प्रत्येक श्वास
तुज्यामुलेच मी आज पुन्हा उभा राहिलो
हिर्मुस्लेला मी पुन्हा एकदा फुल्लो

आयुष भर तू खुप केले माज्या साथी
आता मलाही करायचे तुज्यासाठी
उरलेले हे मज़े आयुष आता फ़क्त तुज्या साथी
अयुशाभर मी तुजा
दास बनुन राहिल
तुज्या एक हकेची वाट फ़क्त
हा मित्र तुज्या साथी जिव देऊन जाइल ............ ......... ....

Read more...

तू आलीस तेंव्हा...........

तू आलीस माझ्या जिवनात तेंव्हा,
मी जिवीत झालो ।
तू आलीस माझ्या स्वप्नात तेंव्हा,
मी निर्जीव झालो ।
तू हसलीस माझ्याकडे पाहुन,
तसा मी बेधुंद झालो ।
तू रडलीस माझ्या कुशीत,
अन मी बेचैन झालो ।
तू केलास माझा धावा तेंव्हा,
मी अवाकच झालो ।
तू आलीस वाऱ्याच्या झुळुका सोबत,
तू गेलीस एका वादळासोबत,
पण, मी मात्र इथेच राहीलो ।

Read more...

तेव्हापासून आजपर्यंत

तेव्हापासून आजपर्यंत

पहिल्या पावसात भिजताना
आठवतंय तुला?
तू विचारलंस, मला
आवडतं का तुला पावसात भिजायला?
मी नही म्हंटल्यावर केवढा चिडलास
रागारागाने गेलास निघून
आणि मी धावत आले तुझ्यामागून्
तेव्हापासून आजपर्यंत
किती धावडवलंस आयुष्यात मला
कल्पना तरी आहे तुला?
मला मात्र प्रत्येक पहिल्या पावसात
त्या पहिल्या पावसाची आठवण येते
आणि मनातल्या मनात
मी धावलेलं अंतर मोजत रहाते.....

Read more...

तो क्षण निघून गेला .....

तो क्षण निघून गेला .....

तो क्षण निघून गेला मी पाहतच राहीलो
बोलायच खुप होत पण निशब्द झाहलो
सारे शब्द जणू रानोमाळ पळून गेले माझे
ओठ उघडलेच नाही डोळ्यात विरघळत राहीलो.
तु समोर होतीस मी कोपरा शोधत रहीलो
तु वळून पाहत होतीस मी वळत राहीलो
आज कळाल कीती कठीण असत प्रेम
काही सपंवुन गेले मी सुरु करण्यात राहीलो.
तुझे डोळे बोलत होते मी पपण्यांत राहीलो
तुझे इशारखुणवत होते मी बघण्यात राहीलो
कोणीही त्या संधीच सोन केल असत आज
मी 'सोन्या' सोन्यासाठी संधी शोधत राहीलो.
वेळ जात राहीली मी आज वाहत राहीलो
मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीलो
तु माझ्या काळजात सामावुन गेलीस सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीलो.

Read more...

खरी मैञी.....

खरी मैञी.....
आयुष्याच्या वाटेवर हवी असते सरवाना खरी मैञी
अशीच मैञी शोधतांना तुझी ओळख झाली
तुच स्वतहुन मला मैञीची आँफर दिली
मीहती विचार करता स्वीकारली
मी तुला माझ्याबद्दल सगळ सांगत गेलो
तु मात्र तुझ्याबद्दल काहीच सांगितले नाहीस्
मी मात्र तुझ्या मैञीमधे गुंतत जात होतो
तुला मात्र याचा साधा गंधही नव्हता
आपल्या मैञी वर माझा खूप विश्वास होता
पण त्या विश्वासाचा तु कधि अविश्वास केला ते कळळच नहि
आपल्या मैञीला तु एक टाईमपास म्हणून बघितले
मी मात्र याला खरी मैञी म्हणून बघितले
आज तुला माझ्या मैञीची किंमत कळणार नाही
मी निघुन गेल्यावर कदाचित तुला कळेल
आयुष्यात कधीही माझ्या मैञीची आठवण झाली
तर नुसती हाक दे तुझा मित्र तुझी वाट पाहत आहे
आपल्या मैञीवर माझा अजुनही विश्वास आहे
तुला माझी मैञी समजण्याची मनात आस आहे.

Read more...

थेंब एक असा बरसून गेला..

थेंब एक असा बरसून गेला..

गडगडाट ना कल्लोळ झाला..
घननीळ मुक्याने बोलून गेला..

सुटला ना जरा भिरभीर वारा..
वादळ थेंबात निचरून गेला..

झाकोळ रात्रीत दडवून गेला..
अवचित पाऊस बरसून गेला..

दिशा दिशांत पसरवून शहारा..
अंतरंगी गारवा झिरपून गेला..

अलवार झेलता झेला नाभीचा..
अलगूज कधीचे मांडून गेला..

कितीक अश्या अबोल गाथा..
भिजल्या मला सांगून गेला..

थेंब एक असा बरसून गेला..
थेंब एक असा भिजवून गेला..

Read more...

पानझड येईलच...

पानझड येईलच...
देह जळेल्,
पण मनाचे काय?
शरीराची राख होईल,
पण भावनांचे काय?

प्रश् होत राहतील,
अंतर मनाला कित्येक,
उत्तर मिळेल ना,
ना माझ्या आसवात प्रत्येक...

आसवांचा डोह,
पापण्यांच्या पदरा आड...
मी मेल्यावर,
उगवेल तिथे प्रेमाचे झाड...

आसवांच्या पाण्याने...
दुखांच्या छायेखाली वाढेल ते...
समजेल प्रत्येक भावनाना...
आता अश्रूंच्या जागी पान गाळेल् ते...

वादळ असो वा पाऊस,
स्तब्ध तो, मी बनून उभा असेल..
तू येशील जरी सावलित माझ्या..
इथे प्रत्येकालाच मुभा असेल....

ना बोलणार मी काही..
ना काही सांगणार कुणाला...
तू निश्चिंत राहा...
बस जा तुझ्या जिवाला...

पानझड येईलच...
मी परत जळेलच...
पन हसत हसत....

Read more...

शेवटची भेट...........

Saturday, April 17, 2010

शेवटची भेट...........
मला ती आज शेवटच भेटणार होती
दुख:शी भेट माझी आज तिथेच घडणार होती
आजचा दिवस सहज सरत होता
"अरे जरा दमानं" सांगितल तरी ऐकत नव्हता

तिला आज भेटुच नये असे वाटत होतं
मन माझं तिच्या निरोपाच्या
भयाने आतल्याआत तुटत होतं
पण पुन्हा तिचं ते मोहक रुप,
ते गहिरे डोळे मला दिसणार नव्हते
एकदाच शेवटच म्हणत
आज मन तिच्यासाथी हरणार होतं

कधी नव्हे ते आज पोहोचलो मी वेळेवर
नेहमी जिथे बसायचो बसलो
हात टेकवत त्या बाकावर
आज बागेतली गुलाबी फ़ुलं
मला काळी कुळकुळीत दिसत होती
पाखरांचे ते किलबीलणे मला विरह गाणी वाटत होती

अचानक बागेतलं वातावरण शांत झालं
"ही वादळापुर्वीची शांतत रे"!!
जणु मला इशा-याने सांगितल
हळु हळु काळे ढग जमु लागले
माझा हा विरह सोहळा पाहण्यास जणु ते आतुर झाले

तेवढ्यात ती आल्याची चाहुल लागली
तिने मला पाहताच लगबगीने पावलं टाकली
ती जवळ जवळ येत होती आणि पाऊशी सुरु झाला
सोबत त्याच्या विजाही कडाडु लागल्या
"आज तिच्या नजरेला नजर देउनच बोलणार"
मनात मी शपथ घेतली
पण ती समोर येताच माझ्याच
नजरेने माघार घेतली, नजर माझी भेदरली

ती शांत उभी होती
"उशीर का केलास"? मी विचारले
"अरे काम होतं जरासं!!" ती उत्तरली
बरं ठिक आहे म्हणत!! मी मान वळवली

का रे काय झाले ? तिने विचिरले
कुठे काय !! काही नाही ?
म्हणत मी तिच्या त्या प्रश्नाला टाळलं

"अछ्चा माझं लग्न ठरलय तो युएसए ला आहे"! तिने हसत सांगितल

माझं काय? मी झुरत विचारलं
अरे सॉरी घरातले तयार नव्ह्ते
मी तरी काय करु ?? सगळं गणितच चुकले
चल मी निघते म्हणत ती उठु लागली
पाठी न बघताच ती पुढे चालु लागली

नजर माझी तिच्या पाठमो-या
आकृतीकडे फ़क्त पाहत राहीली
हळु ह्ळु तिची ती आकॄती
माझ्या डोळयात फ़क्त भीजत राहीली
सोबत पावसाची सरही वाढु लागली
त्या पावसाच्या पाण्यात माझ्या
स्वप्नांची कागदी नाव बुडु लागली.........

Read more...

माझी चारोळी

तुला माझी होताना,
एकदा तरी पहायचे होते,
एकदा का होईना पण,
तूझ्या मिठीत विसावायचं होत.

Read more...

आठवते तुला ती पहीली भेट

Thursday, April 15, 2010

आठवते तुला ती पहीली भेट
माझ्या सारखंचं तुझंही झालं होतं
नेमकं काय बोलायचं
एक अनामिक ओझंही आलं होतं

आठवते तुला ती पहीली भेट
तुझ्या डोळ्यात रहस्य दडलेलं
सात जन्माचं नातं
मी पहील्या नजरेतचं अनूभवलेलं
आठवते तुला ती पहीली भेट
किती गोडवा दाटलेला
दिवस तो अमेचा होता
तरी पाडवा वाटलेला
आठवते तुला ती पहीली भेट
भावनांच्या चांदण्याने भरलेली
एका चंद्राने अलगद एका
चांदनीला मिठीत धरलेली

आठवते तुला ती पहीली भेट
भावनांनी कशी गर्दी केलेली
गर्दीत हरवताना कळलचं नव्हतं
रात्र कुठे अर्धी गेलेली
आठवते तुला ती पहीली भेट
दाटून आलेला चांदण्यांचा पहारा
अंतर दोघात होतं तरीही
चढत गेलेला देहाचा पारा
आठवते तुला ती पहीली भेट
किती हायसं वाटलेलं भावनांना
कवटाळलं होतं एकमेकांच्या
विचारांनी विचारांना
आठवते तुला ती पहीली भेट
मुक्या भावनांचं एक तळ साचलं होतं
दोघही तसे अज्ञानच होतो, तरीही
एकमेकांच अंतर्मन वाचलं होतं 

Mail By Kalpana

Read more...

प्रेमात सगळ असच असत..

Wednesday, April 14, 2010

प्रेमात सगळ असच असत..
किती रे छळतोस मला?
नदि सागराला म्हणाली
अन् कोसळनाऱ्या प्रत्येक् लाटेत
माझे अस्तित्व भिजवतोस्...

भिजवणारा ओलावा माझ्यात् कधिच् नव्हता..
नदिला कवेत् घेत् सागर् हळुच म्हणाला,
विचार् त्या सुर्याला
दररोज माझ्यात बुडुन् सुध्दा..
तो मात्र् कोरडाच उरलाय

तुझ माझ्यावर् प्रेमच नाहि
आज् चन्द्र सुध्दा आकाशावर रागवला
अन् विझत जानाऱया डोळ्याने
उगवत्या सुर्याकडे पाहत् राहिला

प्रेम तुझ्यावर नाहितर कुणावर करणार
आरक्त नजरेने आकाश बोलल...
अन् ताऱ्याना अन्धारात् पेटवुन कोणाचि वाट बघणार?
प्रेमात सगळ असच असत..
तो मनाशिच् म्हणाला
अन् पुन्हा तिचि वाट् बघत्
वाळुत् घरे बान्धत राहिला!!!

Read more...

तिची भेट…..

Tuesday, April 13, 2010

तिची भेट…..


आज प्रथमच तिला पहिल
मन वेडावुनच गेल,
एकाच नजरेत तिने
मला पुरत घायाळ केल,

गुलाबी गाल... हरीणिची ती चाल
मादक अशी तिची अदा,
काय सांगू मित्रांनो...
मी झालोय तिच्यावर फ़िदा,

एकटक पाहत बसलो
विसरून सर्व भान,
मिळताच नजरेला नजर
तिने खाली घातली मान,

तिच्याजवळ बोलायची
इच्छा खुप झाली,
कसलाही विचार न करता
सरळ तिचीच वाट धरली,

तीही थोडीशी पुढे आली
कदाचित तिलाही काही बोलायच होत,
काय सांगू मित्रांनो....
नेमक तेव्हाच आईने जागवल होत... 

- परेश चाफे

Read more...

विसरलो तिला

विसरलो तिला


पावसात या हरवून गेलो
शोधताना तिला, जगन विसरून गेलो,
वेळ सरत होती, पण मन हलतच नव्हत
आपल्यासाठी ही कोणी असेल
सारखे असेच वाटत होते,
विसरलो तिला पण
डोले पाण्याने भरले,
तिच्या नुसत्या आठवणीने
हे वेडे मनही रडले.....

Read more...

का? का? का?

माझे शब्द, माझ्या कवीता,
माझा चेहरा, माझी ओळख,
दिवसेंदिवस धुसर अन अस्पष्ठ...
आहेत त्या जुन्या आठवणी
त्या जुन्या वहीची पाने...
त्यात ठेवलेले एक "मोरपीस"
एक "गुलाब" आणी एक "जाळीचं पिंपळपान"
वाटतं फेकुन द्यावं सारं...
का? कोणासाठी? अजुन कितीवेळ?
कवी .... कवीता... का?
"प्रेमकवीता"... "विरहकवीता"...
अजुन काय काय लिहायचे ?
एखाद अप्रतीम काव्य लिहीले?
का अजुन शब्दच सापडले नाहीत?
काय मिळालं काय गमावलं ह्याचा मांडलेला "हिशोब"..
का गुंतलेय मन अजुन त्या जिर्ण पानांत?
का दाटतेय पाणी पुन्हा पुन्हा डोळ्यांत?
कसला हा बंध? बंध का बंधन?
सारं कसं अकल्पीत अनाहुत,
अन जगण्याचं हरवलेलं ध्येय...
का?

Read more...

तिच्या प्रेमात पडतांना

तिच्या प्रेमात पडतांना
तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं
तोंड दुखेपर्यंत बडबडलो
पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं.

तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं
तिच्या नजरेला नजर भिडवतांना
तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं.

तिच्या हाताचा, ओठणीचा,
स्पर्श हवाहवासा वाटतो
सांगेन तिला कधीतरी म्हणतांना
हा विषय काढायचं राहूनच गेलं.

हसत राहीलो, हसवत राहिलो
तिला दरवेळी, दर भेटीला.
तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना
माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं राहूनचं गेलं.

ती आली की वेळही
उडून जायचा मला न समजता.
पण,
त्या दिवशी ती आली आणि निघाली
त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून गेलं. 
MAIL by Geeta

Read more...

दोन पाखरांचा संसार होता...

Monday, April 12, 2010

दोन पाखरांचा संसार होता...
वास्तवात नाही पण तिच्या स्वप्नात होता..

१४ फेब्रुवारी ला लग्न...
आणि व्हायचा विचार होता..

लग्नानंतर रोज एक चोकलेट..
आणि रोज बाहेर फिरायला जायचं असा तिचा हटट होता..

आपले चौघांचे कुटुंब असेल..
मोठी कृपा तर छोटा पार्थ असेल...

दर १ नोव्हेंबर ला कैंडललाइट डिनर..
तिथे आपल्या दोघं शिवाय आणखी कुणी नसेल..

आपल्या दोघांच छोटस घर असेल..
गुलाबी भिंती आणि मार्बल फ्लोर असेल..

कृपा ला डॉक्टर आणि पार्थ ला स्पोर्टसमन बनवायचे...
आणि आपण आपल्या जबाबदारीतुन मुक्त व्हायचे....

आमच्या ह्या संसाराला कुणाची तरी नज़र लागली...
आमच्या स्वप्नाची नाव नशिबाच्या सागरात बूडू लागली..

त्या बुडणाऱ्या नावेकडे बघन्यावाचून कोणताच पर्याय नव्हता...
घात करणाऱ्या त्या लाटा थाम्बायाचे नाव घेत नव्हत्या...

शेवटी स्वप्नांची ती नाव बूडून गेली...
पाखरांच्या स्वप्नाना तडा देऊन गेली..

स्वप्न तुटल्याने ती दोन पाखरे तडफडत होती...
आता कधी जिव निघून जातो ह्याकडे नज़र लागली होती...



Mail By Kalpana

Read more...

मिठी

Saturday, April 10, 2010

मिठी 

सांग असं अर्ध्यावर कुणी तोडतं का नात
पडला ना जो कमी काही, त्यास विश्वास म्हणतात.

तुला एकदाही न वाटले विचारावा खड्सून जाब
मग मी केलेना जे प्रेम ,त्यास माझी व्ययक्तीक बाब म्हणतात.

तुला वाटलेच कधी हसावे तर हास तुझ्यासारखेच गोड
माझ्यासारख्याचे जे होते ना, त्यास घायाळ म्हणतात.

तुला हवा होता देव पूजावया खास
चुकतो ना जो माझ्यासारखा कुणी, त्यास माणूस म्हणतात.

आता तुही बसतेस डोके खुपसून मांडीमध्ये 
पाझरतो ना जो कुणी डोळ्यातून ,त्यास पश्चाताप म्हणतात.

मी नसल्यावरही होतो माझा असल्याचा भास तुला 
कावरी बावरी होतेस ना सारखी, त्यास विरह म्हणतात.

आता धावत ये घडल्या प्रसंगाची ना मानता भीती 
समावशील ना अवघी ज्यात, त्यास मिठी म्हणतात

Read more...

"आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं

"आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं
असली जरी वाट कठीण चालतच जायचं असतं
आयुष्यात मात्र कधी मागे सरायचं नसतं

असेल विश्वास आपल्यांवर जरी
परक्यांवर ठेवायला कधी कातरायचा नसतं
आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचं असतं

नवीन काही तरी शोधताना जुन्यांना मात्र कधी विसरायचं नसतं
पण जुन्यांच्या साथीत राहून नव्यांना कधी डावलायच नसतं
आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं

आयुष्यातल्या कटू आठवणी आणि सुखी क्षण वाटण्यासाठी
कुणीतरी असावं लागत असतं
 म्हणूनच देवाने बनवली आहे मैत्री या जगात
खरया मित्रांचं ते कर्तव्य असतं पण
खोट्याना  ते जमेलच असं नसतं
म्हणूनच आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं..

आयुष्य असते एक लढाई
ती प्रत्येकालाच जिंकावास वाटत असतं
हरलो जरी त्यात कधी खचायचा नसतं
पुन्हा नव्या उमेदीने जगायला शिकायचं असतं
आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं

आयुष्यात जरी हरलो तरी साथ घ्यायची जिंकनार्याची
कारण तो सुद्धा हारल्यानंतरच जिंकायला शिकलेला असतो
अनुभवाच्या बोलातून त्याच्या सगळं काही शिकायचा असतं
आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं         

आयुष्यात जे जे काही घडतं ते सगळं पहिल्यांदाच आणि नवीनच घडत असतं
पण घडून गेल्यावर मात्र ते कधी विसरायचा नसतं
त्यातूनच घेऊन बोध चांगल्या वाईट गोष्टींचा
आयुष्य सुंदर बनवायचं असतं
म्हणूनच म्हणतो  आयुष्यात कधी मागे सरायचं  नसतं.....
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं...."

परेश गुंदेचा.

Read more...

कहाणी ही एका वेडया मनाची ............ :(

वाळुवर बनवलेली
दोन घरं मी स्वत :ची
एक ते लाटेत कोलमडलं
आणि दुसरं ते वाहुण गेलं
काय दोष द्यावा त्या लाटेला ?
वाळुवर घर बनवणं
ही गोष्ट्च मुळ चुकीची
कहाणी ही एका वेडया मनाची............  >:(

श्रावणात बहर आला
अख्या रानाला पण
एक कळीही ना
उमलली माझ्या अंगणाला
माझ्या अंगणात होते
हिच चुक का त्या रोपांची
कहाणी ही एका वेडया मनाची ............ :o

चमकत्या त्या वस्तुला
मी नेहमीच सोनं मानलं
समजाऊनही न बदलली
नितीमत्ता माझी
हाव होती तेव्हा मला
त्या चमकत्या सोन्याची
कहाणी ही एका वेडया मनाची........... :-X

आता सगळं संपलय ,
उठलाय सगळा बाजार
जडलाय मनाला
एकटेपणाचा भयंकर आजार
डोळ्यात माझ्या डोलतेय
मजेत आता माळ आसवांची
कहाणी ही एका वेडया मनाची.......... :-[

पाहतोय मी वाट एक
नवी सकाळ उजाडण्याची
पण आता घाई नाही करणार
नवा बाजार मांड्ण्याची
आणि आता वाट पाहणार
नाही कुणाच्या वाटही साथीची
कहाणी ही एका वेडया मनाची ............  :(

Read more...

बालापसुनी दूर आईला नेऊ नको.

बालापसुनी दूर आईला नेऊ नको.

आजन बाळाला देवा दुखी करू नको
बालापसुनी दूर आईला नेऊ नको.

आला धावत धावत
आईज्वळीरडत
माय लेकरांची अखेरची भेट ती.
लोक म्हणतात आई
तू वाचणार नाही
मला एकट्याला सोडून तू मरू नको
आजन बाळाला देवा दुखी करू नको
बालापसुनी दूर आईला नेऊ नको.

देव राहतो कुठे ग
आकाशी त्याचे घर
त्याचा पूर्ण पत्ता लीहून तू दे तरी
पत्र पाठवीन तुला
वेळ लागला तरी
त्याचा राग काही तू मानू नको.
आजन बाळाला देवा दुखी करू नको
बालापसुनी दूर आईला नेऊ नको.

मी नसणार जगात
तू होशील अनाथ
पण माझी आठवण कधी तू करू नको
आजन बाळाला देवा दुखी करू नको
बालापसुनी दूर आईला नेऊ नको.

प्रेमे कवटाळी त्याला तीने प्राण सोडीला
आणी म्हणाली ती त्याला बाळा तू रडू नको
आजन बाळाला देवा दुखी करू नको
बालापसुनी दूर आईला नेऊ नको.

author unknown

Read more...

स्वप्नातला गाव....

स्वप्नातला गाव....

स्वप्नातला गाव माझा
आज स्वप्न बनुन गेला
विसरत गेलो, विसरत चाललो
विसरुन गेलो मी त्याला...
स्वप्नांहुनही किती सुंदर
ह्या क्रुत्रिम शहरांपेक्षा
निसर्ग तेथे वास्तव्याला होता
हिरवी हिरवी गार पालवी
नदी नाल्यांची भांडणं होती
मुले ती तेथे झुला झुलवी
सकाळी सकळी मंदिरात
घंटा वाजत जायची
गाव माझा जागत होता
मंडळी भजन गायची
ते रस्ते करड्या मातीचे
खड्ड्यांचे कुठे दगडांचे
पण पावलांना आपले वाटे
मायेच्या पाऊलवाटांचे....
लोकांच्या जगण्यामध्ये
एक वेगळीच तर्हा होती
फाटके होते खिसे जरी
जगण्याची दौलत होती
त्याच माझ्या गावाला
सोडुन आलो कधीचा
नौकरीसाठी,पैशासाठी
म्हटलं कधी कधी चक्कर मारु
एकदिवस आपल्या गावाकडे
किती वर्ष निघुन गेले
पण तो दिवस आला नाही
गाव माझा बोलावतो आहे
मजला कधीचा...
तो उनाड रस्ता तसाच आहे
माझ्या बालपणीचा...
काहिच नाही बदललं अजुनही तेथे
मी मात्र बदललो...
काल स्वत:मध्ये गुंफलो होतो
आज संसारी गुंफलेलो...
माहित नाही आज तेथे
कसा काय हाल असेल...
स्वप्नांमधला गाव माझा
कदाचीत स्वनांतच दिसेल.....

-- सतिश चौधरी

Read more...

ऋतू

ऋतू हिरवा हिरवा पानापानात साचला
धुंद होवून धारेने सदा पाचूचा घातला!

नभी उधळण झहाली  निलशामल रंगाची
आली अवचित कानी साद वर्षासोहल्याची!

नाद  कानात घुमला मत्त मयूरपंखांचा 
अन काळही संपला चातकाचा प्रतेक्षेचा !

आसुसलेली धरीत्रीही प्रियतमाच्या भेटीला
रूप खुलवाया तिने साज हरिताचा ल्याला!

तिचा प्राणसखा आला रूप साजिरे घेवून
शुभ्र - धवल मोत्याची करी स्वैर उधळण!

अंती मिलन ते झाले  दोन भिन्न - अभिन्नाचे
सृष्टी  सृजन कराया दान दिले आनंदाचे ! 

प्राजक्ता ...    

Read more...

वाट पाहतो मी चंद्र नभीचा

वाट पाहतो मी चंद्र नभीचा
आसुसलेला तुझ्या प्रेमाचा
करतो अशी आर्त विनवणी
बनना तु माझी चांदणी...

रोज येते स्वप्नांमध्ये
येना आता जीवनामध्ये
एक एक क्षण तुझी आठवण
उजळत जाते माझ्या मनी...
बनना तु माझी चांदणी...

सागर माझा तु प्रितीचा
मी किनारा वेड्या मनाचा
मीच किनारी वाट पाहतो
लाट येईल माझी होऊनी...
बनना तु माझी चांदणी...

दाही दिशांना चाहुल लागली
माझ्या मनाला पंख ही फुटली...
उडत जाईल फिरत राहिल
तुझ्या प्रेमाच्या मी गगनी....
बनना तु माझी चांदणी...

-- सतिश चौधरी

Read more...

मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा

मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा
मी इथेच संपलो पुन्हापुन्हा तुझ्याविणा ...!!!
का आली सांजवेळी तुझी याद साजणी ??
आसवांनी वाहण्याचा केला गुन्हा तुझ्याविणा !!
मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा

मी इथेच संपलो पुन्हापुन्हा तुझ्याविणा ...!!!

का आली सांजवेळी तुझी याद साजणी ??

आसवांनी वाहण्याचा केला गुन्हा तुझ्याविणा !!

एक एक दिस वाटे वर्ष वर्ष साजणी

मी कसे जगायचे सांग ना तुझ्याविणा ??

भले आजही तुला जिवंत मी दिसेनही

मी मरण सोसले क्षणाक्षणा तुझ्याविणा !!! "

Author Unknown

Read more...

अपमान करू नका त्यांच्या ममतेचा.....

अपमान करू नका त्यांच्या ममतेचा.....

बदलत चालले जग सरे, नाही इथे कुणी कुणाचा
स्वार्थी बनत चालला माणूस, काळ बदलतोय माणुसकीचा.....

ज्यांनी केले लहानाचे मोठे, त्यांना आज मुले विसरली
स्वता राहिले उपाशी तापाशी, मुलांच्या जीवनात सूखे भरली
रात्रण दिवस मेहनत करुनी, स्वता ओढली दुखाची सावली
त्याच मुलांनी घरा बाहेर काढुनी, गळा घोटला मनवतेचा.....

हीच आहे का आजची पीढी, प्याशन पैशापाठी धावत चालली
आई वडीलांनी घाम गालुनी, मुलांसाठी अनेक स्वप्न पाहीली
यांच मुलांनी हाकलून देताच, स्वप्न यांची अश्रुंनी वाहीली
अरे देव कोणी पाहीला नाही, पण देवारा असतो हा प्रतेक घरचा.....

भरत चालली आज वृध आश्रमे, जड वाटू लागले आई बाप
उतरत्या वयात सहारा छिनूनी, मुले करतात मोठे पाप
आई वडिलांना पैशाने तोलतात, विसरून जातात कर्तव्याचे माप
काय म्हणायच या पिढीला, स्वार्थ आहे हा आंधळे पणाचा.....

देवालाही जे जमले नाही, ते दिले आज आई वडिलांनी
पैशापुढे सर्व विसरले, मुले नाही त्यांची ऋणी
मुले असून नसल्या सारखे झाले, अनाथ झाले हे म्हातारपणी
आजच्या पिढीस सागने आहे, अपमान करू नका त्यांच्या ममतेचा.....

कमलेश गुंजाळ

Read more...

जीवन......!

Thursday, April 8, 2010

Read more...

ती दिसली.....

ती दिसली.....

भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले
तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले.....

तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....

तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....

खुप काही म्हणायच होता, शब्द माझे आतुरलेले
मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....

म्हंटल ज़रा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव
तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव..... 

तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली 
एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....

कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून
बरच काही बोलायच होत, मनात गेले शब्द राहून.....

इतक्यात तिने पाहिले मला, डोळ्यात अश्रु ढाळत
अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली, मलाही न कळत.....

नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची
रेशम गाठी तुटल्या आमच्या, तरी सदैव राहिली ती या वेड्या मनाची.....

कमलेश गुंजाळ

Read more...

होता एक वेडा मुलगा

होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा
आठवण तिची आल्यावर
कविता करत बसायचा..

कधी तिच्या केसांत गुंतायचा,
कधी तिच्या डोळ्यात बुडायचा,
कधी तिच्या ओठांवर अडकायचा,
तर कधी गालवर
गोड हसू आणायचा...

नेहमी काहीना काही उपमा द्याचा
आज परी तर उद्या सरी..........!
प्रेम फक्त तोच करतो असे काही वागायचा

पेनाची शाई संपली तरी शब्द काही संपे ना
त्याच्या कविता तिला हट्टाने दाखवायचा
कवितेतील तीच तू अशी जाणीव मात्र दयाचा

कवीता तिला आवडली की वही मागे चेहरा लपवून
खुप गोड हसायची............ !

पण कवीता तिला कधीच समजली नव्हती
कारण प्रेम फक्त तोच करायचा............ .!
आज नाही त्याच्या आयुषात ती
तरी कवीता करतोय...........!
एक आठवण म्हणुन,
एक समाधान म्हणुन,

होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा........

Read more...

माझं विश्व, मराठी......

Monday, April 5, 2010


माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......

माझं ह्रदय, मराठी......

माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......

माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......

माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......

मी मराठी

Read more...

काळीज रडतंय........

Friday, April 2, 2010

मी म्हंटल "अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी तुला हसतं पाहण्यासाठी,तुझी आस्व पुसण्यासाठी तू फक्त होय म्हण ग,जीव तुझ्यातच गुंतलाय सारा "
तिनेही लाजत म्हंटल "हो राजा मी तुझीच आहे रे
,माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे"
मग कसं कोण जाने,ती माझ्या मिठीत विरून गेली
,विर्घळूनच गेलीअगदी माझ्याही नकळत!!

आता मी मी राहिलो नव्हतो,न ती ती उरली होती
 दोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती..

मग न जाने का नजर माझीच लागली .....

मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली
 अन थोड्याच वेळात रूम तिची गाठलीपत्रीकेसोबत

त्या भाबडीने हात तिचा कापला होता ..
मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता...

पुन्हा येऊन पाहून जा ग
 पत्रिका आहे आपल्याच लग्नाची ..
सोंग केलं होतं ग मी सारं...
फक्त तुला जळवण्यासाठी ..
ग प्रिये थोडं जळवण्यासाठी..

आज तिच्या प्रेतासोबत
 माझंही प्रेत जळतंय...

जीव सोडला आहे....
तरीही काळीज रडतंय...
काळीज रडतंय........

Read more...

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP