मराठी चारोळ्या

Pages

सरडयाला ही लाज वाटावी

Thursday, November 25, 2010


डयाला ही लाज वाटावी इतक्या
पटकन रंग बदलतात हो माणसे
क्षणात शब्द देवून
क्षणात शब्द मोडतात हो माणसे
आधाराला हात देताना ही
नखेच टोचतात हो माणसे
उठवाता उठावता ही
दोन चारदा पडतातच हो माणसे
जखमेवर फुंकर मारताना ही
मिठ्च फवारतात हो माणसे
आपला आपला म्हणत
पाठित घाव घालतात हो माणसे
साधु बनुण ही वासनानाच
कवटाळतात हो माणसे
रामाच रूप घेवून ही रावणाचीच
पुजा करतात हो माणसे
संत्वनाला आल्यावर ही
काटेच पेरतात हो माणसे
मी नाही त्यातला म्हणत
तशीच वागतात हो माणसे
थोड्या फार स्वार्थासाठी
जात बदलतात हो माणसे
केलेल्या उपकराना क्षणात
विसरतात हो माणसे
प्रश्न पडतो मला खरच
आशी का वागतात हो माणसे ?
स्वाभिमान शून्य आयुष्य
कशी जगतात हो माणसे ?

Read more...

ती येणार होती, नाही आली......!

ती येणार होती, नाही  आली......!
पण.............!
तिची  आठवण 
मात्र येऊन गेली...!
शेवटी  तिला भेटण्याची इच्छा मनीच राहून गेली...!तरी पण ......!
भास झाला मनाला ..!
वाटल कि, ती आली...!
पण.............!
दार उघडून पाहतो तर काय....
त्या खट्याळ वारयानेच माझी मस्करी केली.............!
त्या खट्याळ वारयानेच माझी मस्करी केली.............!

Read more...

आयुष्यातील खेळ पत्यांचा......




आयुष्यातील खेळ पत्यांचा......

मारतो राजास एक्का, नहिल्यास दहीला मारतो
कल्पनेचे खेळ सारे, कोणी कुणा ना मारतो
पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे
सारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे

आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला
पत्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला
राणीसही जाणिव काही और होऊ लागली
लाजलि नव्हती कधी ती आज लाजू लागली

दिनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला
पंजा म्हणे चौर्र्यास आता श्रीमंत वाटु लागला
विसरून निजरुप नुसत्या नामरुपी गुंतले
भलत्याच कुठल्या अवदसेच्या पाषात आता गुंतले

नुसता उपाधी भेद कोणी राजा नव्हे राणी नव्हे
आणखी सांगु पुढे तो खेळही अमुचा नव्हे
खेळतो दुसराच, त्याला पाहिले नाही कुणी
म्हणती तयाला इश,म्हणति आल्ला कुणी, येशू कुणी

त्याचा म्हणे हा खेळ, नुसते पत्ते आम्ही पत्यातले
एका परि पत्त्यास कळले मर्म हे पत्यातले
आहे इथे रंगेल कोणी पत्ता असा पत्यातला
आहे जरी पत्यातला तो नाही तसा पत्यातला

नामरूपाचा सतःच्या पत्ताच ना त्याला कधी
ना कशाची खंत होतो राजा कधी, दुर्री कधी
हासतो नुसताच आहे सर्वाहुनी हा वेगळा
आणखी सांगाल काहो वेदांत कोणी वेगळा

Read more...

आज मन पुन्हा शांत आहे

आज मन पुन्हा शांत आहे
तिच्या येण्याची जणू चाहूल घेत आहे
गेली ती सोडून दूर देशी
ज्या देशाचा ठाव नसे मजपाशी
शब्दातून तिच्या अमृत प्यालो मी
भाव सागरात तिच्या कधी यथेच्छ न्हाहलो मी
रस्ते मनीचे चालण्यास तिच्याचसवे शिकलो मी
तिच्याच ओंजळीने सत्य प्यायलो मी
तिच्याचमुळे आहे अस्तित्वात आयुष्यागद्यात मी
गुपित जगण्याचे सोडविले होते तिनेच
अर्थ नसतो शब्दांना असतो तो
त्या मागच्या भावनांना
हेही सांगितले होते तिनेच
तरीही शब्दांमधेच गुंतून राहिलो मी
ती गेली निघून मज पाठीमागे सोडून
मग आत मनात तिचा शोध घेत आहे
तिच्या त्या आठवणीत
आज मन पुन्हा शांत आहे...


mail by
★彡●๋ दिप★彡●๋

Read more...

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP